Homeमुंबई स्पेशलउद्या लोअर परळ,...

उद्या लोअर परळ, प्रभादेवी भागात पाणीपुरवठा विस्कळीत

तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या गुरुवारी, २६ सप्टेंबरला रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्ग येथे तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीदरम्यान जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागांमध्‍ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार आहे.

याचा तपशील पुढीलप्रमाणे-

१. जी दक्षिण- करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, डिलाईल मार्ग, बी. डी. डी. चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

२. जी दक्षिण– एन. एम. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी २.३० ते दुपारी ३.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

३. जी दक्षिण– संपूर्ण प्रभादेवी, आदर्श नगर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वा.) अंशतः (३३ टक्के) पाणीपुरवठा बंद राहील.

४. जी उत्तर– सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वा.) अंशतः (३३ टक्के) पाणीपुरवठा बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content