Homeपब्लिक फिगरतळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील...

तळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील तेथे पुनर्वसन!

रायगड जिल्ह्यातल्या तळिये गावातल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून दिली जातील व ते सांगतील तेथे त्यांचे पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकारतर्फे त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौर्‍याचा प्रारंभ आज तळिये, या गावातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुरूकेला. देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते.

या गावांतील परिस्थिती अतिशय भीषण आहे. पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावात झालेले नुकसानसुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावे, असा प्रयत्न केला, असे फडणवीस यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.

आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह सार्‍याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. या लोकांना एनडीआरएफचे अनुदानही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची ही वेळ आहे. भाजपाकडूनही शक्य ती तातडीची मादत पोहोचवी जात आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content