Homeपब्लिक फिगरतळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील...

तळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील तेथे पुनर्वसन!

रायगड जिल्ह्यातल्या तळिये गावातल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून दिली जातील व ते सांगतील तेथे त्यांचे पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकारतर्फे त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौर्‍याचा प्रारंभ आज तळिये, या गावातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुरूकेला. देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते.

या गावांतील परिस्थिती अतिशय भीषण आहे. पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावात झालेले नुकसानसुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावे, असा प्रयत्न केला, असे फडणवीस यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.

आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह सार्‍याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. या लोकांना एनडीआरएफचे अनुदानही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची ही वेळ आहे. भाजपाकडूनही शक्य ती तातडीची मादत पोहोचवी जात आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content