Homeब्लॅक अँड व्हाईटभारत व मंगोलियातले...

भारत व मंगोलियातले संरक्षणविषयक संबंध होणार आणखी सुदृढ

भारत आणि मंगोलियातले संरक्षणविषयक संबंध अधिक सुदृढ करण्याच्या उद्येश्याने या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांच्या संयुक्त कार्यकारी गटाची दोन दिवसांची 12वी बैठक काल मंगोलियाची राजधानी उलानबातर इथे समाप्त झाली. भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्टेट सेक्रेटरी ब्रिगेडियर जनरल गानखुयाग दावगदोर्ज या दोघांनी या बैठकीचे सहअध्यक्षस्थान भुषवले. भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.

संयुक्त कार्यकारी गटाच्या या बैठकीत दोन्ही देशांनी परस्परांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण क्षेत्रविषयक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांच्या प्रमुख प्रतिनिधींनी विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपाययोजनाही निश्चित करून त्या दिशेने कार्यवाही सुरु करण्यासाठीच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी सध्याच्या भूराजकीय परिस्थितीबद्दलच्या परस्परांची मते जाणून घेतली.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद यांनी भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राची क्षमता यावेळी अधोरेखित केली. मंगोलियाच्या सशस्त्र दलांसोबतची भागिदारी  फलदायी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंगोलियानेही भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राच्या क्षमतेप्रती विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशांच्या या प्रमुख प्रतिनिधींनी परस्परांमध्ये दृढ होत असलेल्या संबंधांची ग्वाहीदेखील यावेळी दिली.

भारताच्या  संरक्षण मंत्रालयाचे  सहसचिव अमिताभ प्रसाद आणि भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे यांनी मंगोलियाचे उपसंरक्षणमंत्री बी. बयारमगनई यांचीही भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या शिष्टमंडळाने उलानबातर इथल्या प्रशिक्षण संस्थेला भेट दिली आणि तिथे राबवल्या जात असलेल्या उपक्रमांचाही आढावा घेतला.

मंगोलियासोबत भारताचे जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नागरी संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना परस्परांचे ‘आध्यात्मिक शेजारी’ मानतात. सध्याच्या आधुनिक काळात लोकशाही, स्वातंत्र्य आणि बाजारआधारित अर्थव्यवस्था यांसारख्या मूल्यांनी दोन्ही देशांना परस्परांच्या अधिक जवळ आणले आहे.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content