Homeमाय व्हॉईसयापुढे अल्पसंख्याकांनाही देणार...

यापुढे अल्पसंख्याकांनाही देणार काँग्रेस उमेदवारी

काँग्रेस सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून महाराष्ट्राचे माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजासाठी जो मुद्दा मांडला त्याची अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीच्या पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल घेतली असून यापुढे कॉँग्रेसमार्फत सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी आज प्रदेश कॉँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉँग्रेसने अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजाला प्रतिनिधित्व दिले नसल्याने अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजात पक्षाबद्दल चुकीचा संदेश जात असून त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असे स्पष्ट मत पक्षश्रेष्ठींकडे मांडणारे प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांचा मुद्दा एकदम योग्य आहे. नसीम खान यांनी पुण्यात राहुल गांधी यांची भेट घेतली व मी त्यांना निवेदन केले की जो राजीनामा त्यांनी दिलेला आहे तो परत घ्यावा व प्रचारकार्यात सक्रीय व्हावे, असे चेन्नीथल्ला म्हणाले.

अल्पसंख्याक समाज, उत्तर भारतीय समाजाची भावना मी अखिल भारतीय काँग्रेसला कळवली होती. माझ्या पत्राची पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दखल घेतली. समाजाच्या वतीने मी काही मुद्दे मांडले होते. येणाऱ्या काळात त्यावर पक्ष योग्य तो न्याय देईल. मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असून राहुल गांधी व मल्लिकार्जून खर्गे यांच्या लढाईत मजबूतपणे सहभागी होत इंडिया आघाडीचा पंतप्रधान व्हावा यासाठी काम करणार, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले.

यानंतर रमेश चेन्नीथल्ला व नसीम खान यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांना संबोधित केले. ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी नसीम खान यांच्या समर्थनाथ राजीनामा दिलेला आहे त्यांनी तो परत घेऊन पूर्ण ताकदीने प्रचारकार्यात सक्रिय व्हावे व मुंबईसह राज्यातील कॉँग्रेससह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

Continue reading

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...
Skip to content