Homeपब्लिक फिगरआज खऱ्या अर्थाने...

आज खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला नव्या पर्वाचा..

विजयाच्या जोशाने, मताधिक्याच्या त्वेषाने, प्रचंड संख्येने उसळलेल्या या जनसागराच्या उपस्थितीत आज माझ्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सांगता सभेवर उपस्थित जनसमुदायाने अफाट जल्लोषात प्रेमाचा, पाठिंब्याचा जो वर्षाव केला, तो पाहता आज प्रचाराची सांगता जरूर झाली. मात्र खऱ्या अर्थाने प्रारंभ झालाय तो नव्या पर्वाचा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल व्यक्त केल्या.

बारामतीत या सभेसाठीची आजची गर्दी आणि या गर्दीचा जोश “न भूतो न भविष्यती” असाच होता. त्या जोशातून घुमणाऱ्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. माझ्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी टिपेला पोहोचला. आजची सभा अजितदादांनी अक्षरशः एकहाती जिंकली. या सभेचा उत्स्फूर्तपणे निर्माण झालेला उत्साही माहोल चेतना निर्माण करणारा, केवळ विजयाची नव्हे तर प्रचंड मताधिक्याची खात्री देणारा होता. ही खात्री देणाऱ्या तमाम मायबाप जनतेचे खूप खूप आभार, असेही त्या म्हणाल्या.

या सभेस राष्ट्रवादीसह महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. शिवाय अनेक संघटना, संस्थांनी यावेळी जाहीर पाठींबा दिला. त्याबद्दल त्यांचेही आभार आणि मंगळवारी, ७ मे रोजी “घड्याळ” या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, अशी विनंतीही सुनेत्रा पवार यांनी केली.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content