Homeएनसर्कलकारगिल विजयाच्या स्मरणार्थ...

कारगिल विजयाच्या स्मरणार्थ दिल्लीत ‘ऑनर रन’ आयोजित!

कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ, भारतीय सैन्याने माजी सैनिकांची  अर्ध  मॅरेथॉन ‘ऑनर रन’ काल दिल्लीत आयोजित केली होती. ‘ऑनर रन’ या संकल्पनेंतर्गत भारतीय सैन्य, निवृत्त सैनिक, सर्वसामान्य जनता आणि विशेषत: तरुण यांच्यातील बंध अधिक दृढ करणे हा उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान शूरवीरांना आदरांजली वाहताना विविध भागातून ‘ऑनर रन’मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी आपल्या राष्ट्राची कुवत, क्षमता आणि उर्जा अधोरेखित केली. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अनेक लष्करी सैनिक, निवृत्त सैनिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘ऑनर रन’ ही मॅरेथॉन चार श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली होती. 

ऑनर रन

21.1 किमीच्या पहिल्या श्रेणीला ‘कारगिल रन’ असे नाव देण्यात आले. इतर तीन श्रेणींमध्ये 10 किमी धावण्याची ‘टायगर हिल रन’, 5 किमी धावण्याची ‘तोलोलिंग रन’ आणि 3 किमी धावण्याच्या ‘बटालिक रन’ चा समावेश होता. 14,000 हून अधिक सेवारत कर्मचारी, निवृत्त सैनिक, एनसीसी कॅडेट्स, लष्करी जवानांचे कुटुंबिय आणि विविध वयोगटातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी विविध श्रेणीतील विजेत्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित केले. कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या विजयाची माहिती देणार्‍या भारतीय लष्करातील निवृत्त सैनिकांच्या विभागातर्फे एका प्रदर्शनाचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते. या दरम्यान स्पर्धकांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन या विजयाच्या उत्सवात त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.

Continue reading

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...
Skip to content