Homeएनसर्कलपदोन्नतीतल्या आरक्षणावर कोण...

पदोन्नतीतल्या आरक्षणावर कोण नमते घेणार?

पदोन्नतीतले आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उपसमितीच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. सत्तेतल्या काँग्रेसने या निर्णयाला ठाम विरोध केला असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे या विषयावर नेमके कोण माघार घेणार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने सात मे रोजी शासननिर्णय जारी करून पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले होते. काँग्रेसचे नेते डॉ. नितीन राऊत यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस, हा निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडेल, असे जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळातही राऊत यांनी हा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे त्यांना बोलूच देण्यात आले नाही.

पदोन्नती

त्यावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. त्यात नितीन राऊत, वर्षा गायकवाड आदी मंत्री सहभागी झाले होते. मात्र, सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी यातून मार्ग काढला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर नवाब मलिक तसेच छगन भुजबळ या मंत्र्यांनीही पदोन्नतीतील आरक्षणाच्या विषयावर मार्ग काढला जाईल, असे सांगितले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content