Homeएनसर्कलथायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार...

थायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार उभारा!

थायलँड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलँडमध्ये अनेक बुद्धविहारे आहेत. मात्र थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात यावे. त्यासाठी थायलँड सरकारने जमीन द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

बँकॉक येथील दौऱ्यात त्यांनी थायलँडचे संरक्षणमंत्री डॉ. सुतीन कुंगसंग यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची मागणी केली. यावेळी थायलँड पंतप्रधान कार्यालयाच्या प्रमुख पीआरओ डॉ. जीब चंत्रास्मी उपस्थित होत्या. त्यानंतर थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्ध विहार आणि डॉ. आंबेडकर आंतराष्ट्रीय केंद्रासाठी जमीन थायलँड सरकारतर्फे देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. कुगसंग यांनी दिले.

महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रसार सम्राट अशोक यांनी केला. जगभर बौद्ध धम्माचा प्रसार त्यांनी केला. सम्राट अशोकानंतर सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन भारतात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी भारताला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. त्यांनी मानवतेच्या, समतेच्या विचारांसाठी उभारलेला मानवमुक्तीचा लढा; त्यांनी भारतात केलेले धम्मचक्र प्रवर्तन याची जगात नोंद झाली आहे. त्यामुळे थायलँडमध्ये डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले पाहिजे, अशी सूचना आठवले यांनी डॉ. कुंगसंग यांना केली.

थायलँडमध्येही आठवलेंचे दिसले व्याघ्रप्रेम

थायलँड दौऱ्यात रामदास आठवले यांनी बँकॉक पट्टाया येथील टायगर पार्कला सहकुटूंब भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा, पुत्र जित, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, उद्योजक राज वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content