Homeएनसर्कलनिवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्राची देशभरात...

निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्राची देशभरात विशेष मोहीम सुरू!

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने विभागात तसेच केंद्र सरकारी निवृत्तीधारकांच्या संस्थांमार्फत देशभरात 3.0 ही विशेष मोहीम सुरू केली आहे. 15 सप्टेंबर 2023पासून मोहिमेचा प्राथमिक टप्पा सुरू झाला. मोहिमेदरम्यान साध्य करण्यासाठी लक्ष्य ठरवण्यासाठीचा हा टप्पा होता. मुख्य मोहीम दोन ऑक्टोबर 2023पासून सुरू झाली आणि ती 31 ऑक्टोबर 2023पर्यंत चालेल.

यामध्ये प्रलंबित गोष्टींचा निपटारा, स्वच्छतेची सवय बाणवणे, अंतर्गत व्यवस्थापन पद्धती बळकट करणे, नोंदी व्यवस्थापनात सुधारणा यावर भर राहील.

या विशेष मोहिमेच्या तयारीच्या टप्प्यात विभागाने आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीधारक संघटनेने देशभरात 50 स्वच्छतास्थळे ठरवली.

आतापर्यंत लक्ष्य निर्धाराच्या बाबतीत उत्तम यश मिळालेले आहे. यावर्षी पाच हजार सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि 600 सार्वजनिक तक्रार अपीलांचे निवारण करण्याचे लक्ष्य विभागाने निश्चित केले आहे. 1358 फाईल्स या मोहिमेदरम्यान पुनर्आढाव्यासाठी निश्चित करण्यात आल्या आणि 883 इलेक्ट्रॉनिक फाईल बंद करण्यासाठी निश्चित केल्या गेल्या. या मोहिमेबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकृत समाज माध्यम हँडलवर आधी व्ट्विटर आणि आता एक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाज माध्यमांवर पन्नासहून अधिक संदेश दिले गेले. ठराविक काळासाठी विभागाने निश्चित केलेले लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने ही मोहीम पूर्ण वेगाने सुरू आहे.

Continue reading

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...

मंगळवार-बुधवारी अंधेरी ते वांद्रे भागात विस्कळीत पाणीपुरवठा

मुंबई महापालिकेकडून जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, ११ ऑगस्‍टला सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्‍टला सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा...
Skip to content