Homeएनसर्कलउद्यापासूनच्या अकृषी विद्यापीठांच्या...

उद्यापासूनच्या अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन!

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या अत्यंत कडक निर्बंधांमुळे उद्यापासून होणाऱ्या राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केला.

सरकारने लागू केलेले निर्बंध १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. यामध्ये संचारबंदीचादेखील समावेश आहे. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचे नियोजनदेखील काहीसे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्यापासून १३ अकृषी विद्यापीठांमधल्या सर्व वर्षांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असे ते म्हणाले.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय देण्यात आले होते. विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरूदेखील केल्या होत्या. मात्र, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

परीक्षा ऑनलाईन

कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण कठीण झाल आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरविले. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंना करण्यात आली आहे. या परीक्षांमधून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हा निर्णय उद्यापासूनच लागू करण्यात येईल. सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण उद्यापासून त्या शक्य नसल्यामुळे सर्वच कुलगुरूंनी सरकारला विनंती केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी संबंधित विद्यापीठांनी घ्यायची आहे. या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्गांच्या परीक्षांचा समावेश असेल, असेही सामंत म्हणाले.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content