Homeएनसर्कल316 लॉ कॉलेजपैकी...

316 लॉ कॉलेजपैकी 243ना बार कौन्सिलची मान्यताच नाही!

मुंबईसहित महाराष्ट्रात 316 अशी महाविद्यालये (कॉलेज) आहेत ज्या ठिकाणी विधिविषयक (लॉ, कायद्याचे) शिक्षण दिले जाते. परंतु त्यातल्या 243 महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच नाही किंवा त्यांच्या परवानगीचे नूतनीकरण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशा महाविद्यालयांतील प्रवेश बंद करावेत, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, टिळक, शिवाजी, एसएनडीटी महिला, कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी, सावित्रीबाई फुले, उत्तर महाराष्ट्र अशा विद्यापीठांच्या अंतर्गत ही 316 विधि महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी 71 महाविद्यालयांकडे परवानगी आहे. 2 महाविद्यालये बंद आहेत. यात नामांकित गव्हर्मेंट लॉ कॉलेज, जितेंद्र चौहान लॉ कॉलेज, केसी लॉ कॉलेज, पद्मश्री डीवाय पाटील लॉ कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, रिझवी लॉ कॉलेज, एसएनडीटी लॉ कॉलेज, टिळक लॉ कॉलेज, मॉडर्न लॉ कॉलेज सिंबायोसिस लॉ कॉलेज, अंजुमन इस्लाम लॉ कॉलेज, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचा समावेश आहे.

सध्या बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा त्यांच्या परवानगीचे नूतनीकरण नसलेल्या विधि महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करत त्यांची मान्यता रद्द करावी. खरे पाहिले तर मुंबई विद्यापीठ किंवा अन्य विद्यापीठांनी आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व विधि महाविद्यालयाची प्रत्येक शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि परवानगीची माहिती संकलित करण्याची गरज आहे. विशेष करुन बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नूतनीकरण केल्याची कागदपत्रे प्रत्येक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्यास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस सत्य परिस्थिती लक्षात येईल, असेही गलगली यांनी म्हटले आहे.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content