Homeएनसर्कलमातोश्री-२च्या आधी शाखा...

मातोश्री-२च्या आधी शाखा अधिकृत का करून घेतली नाही?

मुंबईत बांद्रा रेल्वेस्थानकाजवळची अनधिकृत शाखा तोडली म्हणून बाळासाहेबांचा फोटो तोडल्याचा बनाव करुन काल महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. संजय राजाराम राऊत यांच्या मालकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्री-२ अधिकृत करून घेतली. त्याआधी मुंबईतल्या अनधिकृत शाखा का नाही अधिकृत करून घेतल्या, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला.

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते. का नाही घेतली ती अधिकृत करून? ते म्हणत आहेत की आदेश वर्षामधून निघाले. मागच्या अडीच वर्षांत वर्षामधूनच आदेश निघत होते ना… कंगनाचे घर, कार्यालय तोडायला लावले. नवनीत राणांच्या घरावर कारवाई करायला गेले. राणेंचा बंगला तोडण्यासाठी तुमच्या मालकांनी आणि मालकीणींनी किती फोन केले? अनधिकृत शाखा पाडली ही जर नीच कृती असेल तर मग ही जी कृती होत होती तेव्हा नीचपणा कोण करत होते? बाळासाहेबांचा फोटो काढायला महापालिका अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यांनी फोटो तोडलेला नाही, असे ते म्हणाले.

आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या देवाचे दर्शन घेतले म्हणून त्यांना पोटशूळ उठतोय. तेच जर जामा मशिदीत नतमस्तक झाले असते तर यांना चालले असते. बीआरएस भाजपाची बी टीम आहे, असे हे म्हणतात. मग संजय राऊत यांची उबाठा काय राष्ट्रवादीची ढ टीम आहे, असा सवालही नितेश राणे यांनी केला. प्रकाश आंबेडकर जे हिंदूंची बदनामी करतात, छत्रपतींची बदनामी करतात, त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही. जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा. जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मी वारंवार मागणी करत आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content