Homeएनसर्कलमातोश्री-२च्या आधी शाखा...

मातोश्री-२च्या आधी शाखा अधिकृत का करून घेतली नाही?

मुंबईत बांद्रा रेल्वेस्थानकाजवळची अनधिकृत शाखा तोडली म्हणून बाळासाहेबांचा फोटो तोडल्याचा बनाव करुन काल महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. संजय राजाराम राऊत यांच्या मालकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्री-२ अधिकृत करून घेतली. त्याआधी मुंबईतल्या अनधिकृत शाखा का नाही अधिकृत करून घेतल्या, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला.

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते. का नाही घेतली ती अधिकृत करून? ते म्हणत आहेत की आदेश वर्षामधून निघाले. मागच्या अडीच वर्षांत वर्षामधूनच आदेश निघत होते ना… कंगनाचे घर, कार्यालय तोडायला लावले. नवनीत राणांच्या घरावर कारवाई करायला गेले. राणेंचा बंगला तोडण्यासाठी तुमच्या मालकांनी आणि मालकीणींनी किती फोन केले? अनधिकृत शाखा पाडली ही जर नीच कृती असेल तर मग ही जी कृती होत होती तेव्हा नीचपणा कोण करत होते? बाळासाहेबांचा फोटो काढायला महापालिका अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यांनी फोटो तोडलेला नाही, असे ते म्हणाले.

आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या देवाचे दर्शन घेतले म्हणून त्यांना पोटशूळ उठतोय. तेच जर जामा मशिदीत नतमस्तक झाले असते तर यांना चालले असते. बीआरएस भाजपाची बी टीम आहे, असे हे म्हणतात. मग संजय राऊत यांची उबाठा काय राष्ट्रवादीची ढ टीम आहे, असा सवालही नितेश राणे यांनी केला. प्रकाश आंबेडकर जे हिंदूंची बदनामी करतात, छत्रपतींची बदनामी करतात, त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही. जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा. जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मी वारंवार मागणी करत आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content