Homeएनसर्कलमातोश्री-२च्या आधी शाखा...

मातोश्री-२च्या आधी शाखा अधिकृत का करून घेतली नाही?

मुंबईत बांद्रा रेल्वेस्थानकाजवळची अनधिकृत शाखा तोडली म्हणून बाळासाहेबांचा फोटो तोडल्याचा बनाव करुन काल महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. संजय राजाराम राऊत यांच्या मालकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्री-२ अधिकृत करून घेतली. त्याआधी मुंबईतल्या अनधिकृत शाखा का नाही अधिकृत करून घेतल्या, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला.

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते. का नाही घेतली ती अधिकृत करून? ते म्हणत आहेत की आदेश वर्षामधून निघाले. मागच्या अडीच वर्षांत वर्षामधूनच आदेश निघत होते ना… कंगनाचे घर, कार्यालय तोडायला लावले. नवनीत राणांच्या घरावर कारवाई करायला गेले. राणेंचा बंगला तोडण्यासाठी तुमच्या मालकांनी आणि मालकीणींनी किती फोन केले? अनधिकृत शाखा पाडली ही जर नीच कृती असेल तर मग ही जी कृती होत होती तेव्हा नीचपणा कोण करत होते? बाळासाहेबांचा फोटो काढायला महापालिका अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यांनी फोटो तोडलेला नाही, असे ते म्हणाले.

आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या देवाचे दर्शन घेतले म्हणून त्यांना पोटशूळ उठतोय. तेच जर जामा मशिदीत नतमस्तक झाले असते तर यांना चालले असते. बीआरएस भाजपाची बी टीम आहे, असे हे म्हणतात. मग संजय राऊत यांची उबाठा काय राष्ट्रवादीची ढ टीम आहे, असा सवालही नितेश राणे यांनी केला. प्रकाश आंबेडकर जे हिंदूंची बदनामी करतात, छत्रपतींची बदनामी करतात, त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही. जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा. जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मी वारंवार मागणी करत आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content