Homeएनसर्कलअंतिम श्वासापर्यंत काशी...

अंतिम श्वासापर्यंत काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी लढू!

उत्तर प्रदेशमधील काशी येथील ज्ञानवापी मशिदीत 16 मे 2022मध्ये शिवलिंग मिळाल्यापासून आम्ही सातत्याने त्याच्या मुक्तीसाठी लढा देत आहोत. या लढ्यात मुसलमान पक्षकार यशस्वी होणार नाहीत हे ज्ञात असल्याने, ते या याचिकेच्या संदर्भात अडथळे निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. तसेच काही जणांना हाताशी धरून याचिका मागे घेतल्याच्या अफवा पसरवत आहेत. प्रत्यक्षात कोणतीही याचिका आम्ही मागे घेतलेली नाही आणि मी सर्वांना खात्री देतो की, जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी आम्ही लढत राहू, अशी ग्वाही ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.

ते ‘श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात बोलत होते. काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या श्री श्रृंगारगौरी देवी, हनुमान, श्रीगणेश येथील देवतांची पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही लढा देत आहोत. काशी विश्वेश्वराची मुक्ती होईल, तेव्हा देश अखंड हिंदु राष्ट्र होईल. काशी विश्वेश्वराच्या मुक्तीचे मोठे लक्ष्य घेऊन आपण मार्गक्रमण करत आहोत. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी लावून धरायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी अधिवक्ता नीलेश सांगोलकरयांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संदर्भातील सद्यस्थिती, तसेच कर्नाटक येथील सहकार संजीवनी रुग्णालयाचे डॉ. एन्. रमेश हासन यांनी चन्नकेवर मंदिरात कुराण वाचण्याच्या विरोधात दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती दिली. आंध्र प्रदेश येथील हिंदू उपाध्याय समितीचे संस्थापक अध्यक्ष महेश डेगला यांनीही मनोगत व्यक्त केले.

गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक!

गंगा नदीमध्ये प्राणवायूची पातळी सर्वाधिक असून नदीत ‘बॅक्टेरिया फॉस’ नावाचा विषाणू असतो. त्यामुळे गंगाजल खराब होत नाही. कोरोनाकाळात गंगा नदीच्या किनार्‍यावरील शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण अन्य शहरांहून अल्प आढळले असून बरे होणार्‍यांची संख्याही अधिक आढळून आली आहे. केवळ कोरोनाच नाही, तर अन्य आजारही गंगेच्या पाण्याने बरे होऊ शकतात. त्यामुळे अशा गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अरुण गुप्ता यांनी व्यक्त केले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content