Homeएनसर्कल30 हजार बोगस...

30 हजार बोगस सिमकार्डस बंद! एकाच्या नावावर 684 मोबाईल क्रमांक!!

बनावट कागदपत्रे वापरुन खरेदी करण्यात आलेली सुमारे 30 हजार सिमकार्डस दूरसंचार विभागाने बंद केली आहेत. दूरसंचार विभागाने स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म ‘एएसटीआर’ अस्त्राचा वापर करत, बनावट/खोट्या मोबाईल कनेक्शन्सचे जाळे आणि सायबर गुन्ह्याचा यानिमित्ताने पर्दाफाश केला आहे. एका प्रकरणात तर, एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला 684 वेगवेगळे मोबाईल क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

दूरसंचार सेवा प्रदाते – TSP यांनी जारी केलेले मुंबईतील 30 हजारपेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाईल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले आहेत. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसएने या सर्व मोबाईल जोडण्या तपासल्या असून त्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे. त्यातून त्यांना 62 समूह असे आढळले आहेत, जिथे एकाच छायाचित्राचा वापर करून, वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आले आहेत.

एका समुहात, असे 50 ग्राहक असण्याची मर्यादा आहे. मात्र असे असूनही, या 62 समुहांमध्ये एकूण 8,247 ग्राहक आढळले. याचाच अर्थ, यात पॉईंट ऑफ सेल, म्हणजेच जिथून यांची विक्री केली जाते, असे सिम विक्रेते, यांचाही बनावट सिमकार्ड देण्याच्या कारस्थानात सहभाग असल्याचे स्पष्ट होते. एका प्रकरणात तर, एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला 684 वेगवेगळे मोबाईल क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

मोबाईल

केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल संचार साथी पोर्टलचे उद्‌घाटन केले. या सोहळ्यात आभासी पद्धतीने सहभागी झाल्यानंतर पत्रकारांना संचार साथी, या पोर्टलबद्दल तसेच एएसटीआर अस्त्र, या चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या तसेच माहितीचे विश्लेषण करणाऱ्या विविध तंत्राचा वापर असलेल्या प्रणालीची माहिती मुंबईतील दूरसंचार विभागाचे अतिरिक्त महासंचालक, एच. एस. जाखड यांनी ही माहिती दिली. यावेळी, नंदलाल सचदेव, उपमहासंचालक (ए अँड एचआर), किशोर एक्का, उपमहासंचालक, सुरक्षा, अजय कमल, उपमहासंचालक – तंत्रज्ञान हे अधिकारी उपस्थित होते.

दूरसंचार विभागाने, बनावट सिमकार्डचे हे रॅकेट शोधून काढण्यासाठी एक अभिनव, स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म (सुपर कॉम्प्युटरचा वापर करून) ASTR – अस्त्र यात कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सायबर गुन्ह्यांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी बनावट/खोट्या मोबाईल कनेक्शनचा तपास करणे, ते ओळखणे आणि ते नष्ट करणे, या दृष्टिकोनातून दूरसंचार विभागाद्वारे या तंत्रज्ञानाची रचना आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे असे, दूरसंचार विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सांगितले. ह्या प्रणालीअंतर्गत, ग्राहकांचे छायाचित्र आणि त्यांची माहिती यांची तुलना केली जाते आणि त्यातून मिळणारी माहिती, वेगवेगळ्या नावांच्या त्याच छायाचित्राच्या महितीशी पडताळून पाहिली जाते.

बनावट/खोट्या माहितीच्या आधारे घेतलेले मोबाईल सीमकार्ड, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, राष्ट्रविरोधी करवायांसाठी वापरले जाऊ शकतात. अशी बनावट कागदपत्रे तयार करणारे यात इतके चलाख असतात, की त्यांनी, अशी बनावट ओळखपत्रे, निवासाचे पुरावे तयार केले आहेत, जे मानवी नजरेतून कधीही पकडले जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच, दूरसंचार विभागाने, असे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एएसटीआर अस्त्र, ह्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मचा वापर करत, अशा बनावट-खोट्या सीम्सचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.

या संदर्भात, मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशन, व्हीपी मार्ग पोलीस स्टेशन, डीबी मार्ग पोलीस स्टेशन, डीएन नगर पोलीस स्टेशन, सहार पोलीस स्टेशन, बांगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. अशा कारवाईमुळे, मुंबईतील सायबर गुन्ह्यांसह विविध बेकायदेशीर कामांसाठी अशा बनावट/बनावट, नॉन-बोनाफाईड मोबाईल कनेक्शनचा वापर रोखण्यास मदत मिळू शकेल.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content