Homeमुंबई स्पेशलअखेर ठाकरे-आंबेडकरांमधली चर्चा...

अखेर ठाकरे-आंबेडकरांमधली चर्चा आघाडीवरच अडकली!

महाराष्ट्रात सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला तोंड देण्यासाठी हातात हात घेऊन उभी ठाकलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गट (उद्धव ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची (प्रकाश आंबेडकर) चर्चा महाविकास आघाडीतल्या समावेशाच्या चर्चेभोवतीच घुटमळत राहिल्याचे वृत्त आहे.

आज दुपारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये साधारण दोन तास चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेच्या वतीने खासदार विनायक राऊत तसेच सचिव मिलिंद नार्वेकरसुद्धा उपस्थित होते. ही चर्चा फार गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न झाला. चर्चेआधी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबर आज कोणतीही बैठक नसल्याचे आवर्जून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात आपण नेहमीप्रमाणे पोलिसांशी चर्चा करायला जाणार आहोत. यापलीकडे आज आपला कोणताही कार्यक्रम नाही असे आंबेडकर म्हणाले.

परंतु नंतर अचानक लपतछपत ते ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहोचले. उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आधीच उपस्थित झाले होते. तेथे या सर्वांमध्ये साधारण दोन तास चर्चा झाली. या चर्चेत प्रामुख्याने मुंबई महापालिकेसह इतर महापालिका, नगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा झाली. या निवडणुकांमध्ये एकत्रित लढण्यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला. मात्र सर्व चर्चा अखेर महाविकास आघाडीभोवती घुटमळली.

उद्धव ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीचा भाग आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. अशावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असेल की शिवसेनेच्या जागांमधला एक भागीदार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे ते स्पष्ट होईपर्यंत पुढे कोणताही निर्णय घेता येणार नाही यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. मात्र, सत्ताधारी युतीला रोखण्यासाठी आघाडी करावीच लागेल यावर त्यांचे एकमत झाले, असे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content