Homeटॉप स्टोरीदहावी आणि बारावीच्या...

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच!

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असून पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना जादा वेळ देण्यात येणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. यंदा बारावीचे १४ लाख ७२ हजार तर दहावीचे १६ लाख २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याने ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अतिरिक्त वेळ तर ७० गुणांपेक्षा अधिक गुण असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

परीक्षेच्या काळात एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत पुन्हा त्या विषयाची परीक्षा देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेला देण्याची संधी असेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचे बंधन नसेल. मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीतजास्त २५ विद्यार्थी असतील. त्यांना एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी जवळचे परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात येईल. शाळेत अधिक विद्यार्थी असल्यास त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल. यावेळेस प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा देण्यासाठी दोन संधी असतील. पहिली संधी १४ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान असेल. या कालावधीत जे विद्यार्थी लेखी आणि तोंडी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा या परीक्षा देण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले.

कोरोनामुळे एखाद्या विद्यार्थ्यावर दुसऱ्यांदा परीक्षा द्यायची वेळ आल्यास नव्याने शुल्क भरावे लागणार नाही. तोंडी परीक्षा दोनदा देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही. परीक्षेनंतर ४५ दिवसांमधे निकाल लावण्यात येईल. प्रॅक्टिकल परिक्षेसाठी बाहेरचे शिक्षक परीक्षक म्हणून यावेळेस येणार नाहीत. त्याच शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून काम करतील. मुख्य परीक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकूण अभ्यासक्रमाच्या ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारीत असतील, असेही गोसावी यांनी सांगितले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content