Homeटॉप स्टोरीएसटी कामगारांना ‘शासकीय...

एसटी कामगारांना ‘शासकीय सेवा’ नाहीच?

राज्यातल्या एसटी कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करता येणार नाही, असे आज काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचित केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या एका उच्चस्तरीय अभ्यास समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वीच सरकारमधल्या एका जबाबदार मंत्र्यांनी हे विधान केल्यामुळे एसटी कामगारांच्या विलिनीकरणावर सरकारने काय ठरवले आहे, हे स्पष्ट होते, असा सूर संपकरी एसटी कामगारांमध्ये उमटू लागला आहे.

एसटी कामगारांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करावे या मागणीसाठी कामगार संपावर आहेत. एसटी कामगारांना सरकारी नोकरीत समाविष्ट करता येणार नाही, असे दिसते आहे. त्यासंबंधीची चौकशी करणारा अहवाल अजून यायचा आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय वगैरे अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे एसटी कामगारांनीही अधिक न ताणता संप मागे घ्यावा, असे आवाहन थोरात यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. मुख्यमंत्री आजारी असले तरी ते साऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. परिवहन मंत्री अनिल परब चांगल्या पद्धतीने संप हाताळत आहेत, असेही ते म्हणाले.

विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात विधानसभेला नवीन अध्यक्ष मिळेल. हे अध्यक्ष काँग्रेसचेच असतील. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल हे पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निश्चित केले जाईल, असेही थोरात यांनी सांगितले.

राज्यात सहकार हा विषय चांगल्या पद्धतीने राबविला जात आहे. राज्यात जी समृद्धी दिसत आहे त्यात सहकाराचाच वाटा मोठा आहे, असेही त्यांनी सांगितले.

अलिकडे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल संपलेले आहे. भाजपा कार्यकर्त्यांना सावरण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात भाजपाची अधोगती सुरू आहे. आमचे सरकार चांगले काम करत आहे. पुढील निवडणुकीतही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असेही थोरात यांनी सांगितले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content