HomeArchiveघटमांडणी, सट्टा बाजार...

घटमांडणी, सट्टा बाजार नि सत्तामांडणी..

Details
“घटमांडणी, सट्टा बाजार नि सत्तामांडणी..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशभरात आगामी सत्ता कोणाची यावरून बरीच चर्चा ‘जळी स्थळी काष्ठी पाषाणी’ म्हणावी तशी रंगली आहे. निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसं याला उधाण येत आहे. तर्कवितर्क, अंदाज, वगैरे पुढील बराच काळ चालू राहणार. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी, सट्टाबाजार यांनी आधीच अनुमान लावत ‘नमो’ कौल दिला आहे. त्यादृष्टीने भाजपने ‘सत्ता मांडणी’च्या हालचाली सुर केल्या आहेत. बहुमताचा ‘जादुई आकडा’ कमी पडल्यास गेल्या काळातील घटक पक्षांसह नवे कोणी नि किती येतील याची चाचपणी पूर्ण झाली आहे. भाजप बहुमताचे सरकार स्थापन करेल असा विश्वास शीर्षस्थ नेत्यांना, ज्योतिषांना वाटत असला तरी बेसावध राहून अंगलट येणारी खेळी नको, असे प्रयत्न सुरू आहेत. कागदावरची गणितं मांडली जात आहेत.

सट्टाबाजारात राजस्थानच्या फलोदीचे स्थान वेगळं असल्याचं म्हंटलं जातं. प बंगालच्या मतदानानंतर सट्टाबाजारात अचानक उसळी आली. भाजपचा भाव पुन्हा वाढला तर काँग्रेसचा स्थिर असलेला भाव झपाट्याने खाली पडला. बंगालचे निकाल धक्कादायक असतील असं सांगत सटोडियांनी दोन विभागात सट्टा लावलाय. त्यांच्या मते चांगल्या मतदानामुळे ‘ममता पार्टी’च्या जागा कमी होतील. तर काहींनी हा केंद्र सरकारच्या विरोधातील आक्रोशाचा परिणाम ठरवला आहे असं सांगत जादा पैसा लावलाय.

 

फलोदी बाजारानुसार हे जास्तीचं मतदान म्हणजे भाजपची पुर्वानुमानीत २७० जागांवरून ३००हून जास्तीच्या जागांची झेप तर सुरतच्या सट्टाबाजारानुसार उ. प्र., म. प्र.मध्ये भाजपला मोठा फटका बसणार आहे. यातून रालोआला २३५ जागांवर समाधान मानावे लागेल. या फलोदी बाजाराने पाचव्या टप्यापर्यंत रालोआला २७० ते २८० जागा दिल्या होत्या तर आता ३०० चा अंदाज वर्तवला आहे. सुरत बाजाराने सहावा टप्पा झाल्यावरही २३५ ते२४५ जागा मिळतील असं म्हंटलंय. दिल्लीचा सट्टाबाजार मात्र सायंकाळनंतर भाजपला फायदा होईल म्हणत पैसा काढून घेताना दिसला. भाजपला सातपैकी सहा तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा देऊ केलीय. चार वाजेपर्यंत इथे भाजपला २७ पैसे तर काँग्रेसला १७ पैसे नि आपला ३ पैसे भाव होता. पुढे यात बदल होत, भाजपला पूर्ण पसंती दर्शवत, काँग्रेसला १३ पैसे देत आपवर कोणी बोलीदेखील लावली नाही.

असं सांगितलं जातं की ही लोकसभेची पहिली निवडणूक आहे, ज्यात भाजपनंतर प्रादेशिक पक्षांवर जास्त भाव लावला जात आहे. काँग्रेसला मात्र त्यानंतरची पसंती आहे. काँग्रेसच्या जागा शंभरपर्यंत जातील पण त्यापुढे किती यावर भाव खेळला जात नाही. दिल्लीत मतदान संपल्यावर सर्व सात जागा भाजपला मिळतील असं सांगत नुकसान सोसत आपला पैसा सटोड्यानी काढून घेतला. पूर्ण मतदानाआधी पक्षावर लावलेला पैसा काढून घेण्याची बहुधा पहिली वेळ असावी असं फलोदी बाजाराचं म्हणणं आहे. यावरून आप दिल्लीत तोंडावर आपटली असं निरीक्षकाना वाटतं.

राजस्थानच्या फलोदी सट्टाबाजाराला आशिया खंडात वेगळा दर्जा आहे. पाचव्या टप्प्यातील अंदाजानुसार भाजपला २४०-२४५ तर एकूण रालोआला मिळून ३२०-३२५ जागा मिळतील. येथील विधानसभा निवडणुकीत त्याची भविष्यवाणी जवळपास बरोबर ठरली होती. राजस्थानात भाजपला २१-२२ तर काँग्रेसला ३-४ जागा मिळतील. जोधपुरात भाजपाचे गजेंद्र सिंह, बिकानेरमधून अर्जुन मेघवाल, नागौर येथून लोजपाचे हनुमान बेनिवाल तर बाडमेरमधून काँग्रेसचे मानवेंद्र सिंह जिकंतील असे सांगितले जाते. या चार जागा येथील ‘हॉट’ मानल्या जातात.
घटमांडणी

यंदा ७ मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी काय सांगते ते जाहीर झालं. त्यानुसार मोदी सत्तास्थानी कायम राहणार आहेत. यावरून मोदींना हटवायला देव पाण्यात घालून बसलेल्याचे देव पाण्यातच राहणार हे स्पष्ट झालंय. राजा बदलणार असं भाकीत २०१४ च्या निवडणुकीत आलं होतं. त्यावेळी अक्षयतृतीया दोन मे रोजी तर निकाल १६ मे रोजी लागणार होते. ते भाकीत होतं राजा बदलणार, त्यावरील. देशावरील संकटं कायम राहणार तेही आपण अनुभवलं. उरी, अलीकडचा पुलवामा हल्ला २०१४ चा काश्मीर पूर, त्यानंतर सातत्याने लष्करावर होणारे हल्ले, नोटबंदी, त्यातून निर्माण झालेली आर्थिक मंदी, २०१८ चा केरळचा महापूर, देशभरात दुष्काळी परिस्थिती, पुरस्कार वापसी, जेएनयु वाद, देश छोडो, येमुला नि उ. प्र.तील गोमांस प्रकरण, राफेल भ्रष्टाचार, अशा या ना त्या कारणाने वादविवाद, तंटेबखेडे होतंच राहिले. देशातील वातावरण ढवळून निघालं.

 

भेंडवळची भाकिते अंधश्रद्धा म्हणणारे यावर कधी बोलणार? जे सांगितलं जातं, तसं काही प्रमाणात तरी होतं हे समोर आलं आहे. याला नेमकं काय म्हणणार? विज्ञानदेखील चुकतंय हेही आपण पाहतो. तर काही प्रमाणात इथे भाकिते चुकतात. यावरून सगळंच खोटं ठरवण्यात काय हशील? ही तर ३५० वर्षांची परंपरा!

कोण येणार भाजपबरोबर?

भाजपचे काही नेते नि मित्रपक्षदेखील अंदाज वर्तवताना दिसतात की यावेळी पूर्ण बहुमताचा ‘जादुई आकडा’ भाजप गाठू शकणार नाही. सुब्रमण्यम स्वामी, राम माधव, संजय राऊत आदींनी असं भाकीत केलंय तर अशा स्थितीत कोण येणार भाजपाबरोबर? यावेळी भाजपाने उ. प्र., बिहार, पंजाब, महाराष्ट्र, तमिळनाडू यासह पूर्वोत्तर राज्यात मित्रपक्षांसह तर इतर राज्यात स्वबळावर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. २०१४ च्या निवडणुकीत २७ पक्षांना घेऊन लढणाऱ्या भाजपाने २८२ तर ३३६ जागा रालोआने मिळवल्या. पुढे टीडीपी, आरएलएसपी हे दोन वेगळे झाले.

यावेळी स्थिती निराळी असून वेगवेगळ्या राज्यात विरोधी पक्ष भाजपसमोर आव्हान ठेऊन आहे. काँग्रेसनेही मागच्यापेक्षा आपली स्थिती मजबूत केलीय. त्यामुळे बहुमत न मिळाल्यास काँग्रेसविरोधातील कोण आपल्याकडं येईल याची चाचपणी झालीय. आंध्रमधील जगन मोहन रेड्डींच्या वाय. एस. आर. काँग्रेसवर लक्ष आहे. हा पक्ष यंदा चांगली कामगिरी करेल असं मानलं जातं. विशेष राज्याचा दर्जा ही मागणी पूर्ण करणाऱ्यास समर्थन देण्याचं त्यांनी जाहीर केलंय. काँग्रेससमवेत असलेला विवाद पाहता भाजपला इथे आशा आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर याकडे पाहून भाजपा डोळा मारण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारला मदत करताना महत्त्वाच्या निवडणुकीत रालोआला त्यांनी मदत केलीय. काँग्रेस हा शत्रू असून सरकारमध्ये सामील न होता त्यांचा बाहेरून पाठिंबा मिळू शकतो.

ओडिशातील नवीन पटनायक यांची ‘बीजेडी’ वेळोवेळी या सरकारसह दिसली आहे. काँग्रेसशी असलेला ‘छत्तीस’चा आकडा पाहता त्यांचा पाठिंबा मिळू शकेल. पण, भाजपाने तीव्रतेने इथे निवडणूक लढली आहे हे पाहता मैत्रीची शक्यता धूसर दिसत आहे. मोदींचे मंत्री म्हणून काम केलेले बिहारमधील उपेंद्र कुशवाह महागठबांधनात असले तरी कामी येऊ शकतील. तेथील मुकेश साहनी, जीतनराम मांझी, हरियाणातील ओमप्रकाश चौटाला यांची ईनेलो यासाठीही प्रयत्न होतील. एकूणच बहुमत न मिळाल्यास भाजपाकडून मिळणाऱ्या खिरापतीवर वरच्या पक्षप्रमुखांच लक्ष असेल नि हाकेला ‘ओ’ देतील असं म्हंटलं जातं. पाहू.. घोडामैदान जवळ येतंय. कळेलच काय होईल ते! तोपर्यंत चर्चा करा, अंदाज सांगत राहा.. आपलं काम संपलं, लोकशाही जगेलंच!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशभरात आगामी सत्ता कोणाची यावरून बरीच चर्चा ‘जळी स्थळी काष्ठी पाषाणी’ म्हणावी तशी रंगली आहे. निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसं याला उधाण येत आहे. तर्कवितर्क, अंदाज, वगैरे पुढील बराच काळ चालू राहणार. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी, सट्टाबाजार यांनी आधीच अनुमान लावत ‘नमो’ कौल दिला आहे. त्यादृष्टीने भाजपने ‘सत्ता मांडणी’च्या हालचाली सुर केल्या आहेत. बहुमताचा ‘जादुई आकडा’ कमी पडल्यास गेल्या काळातील घटक पक्षांसह नवे कोणी नि किती येतील याची चाचपणी पूर्ण झाली आहे. भाजप बहुमताचे सरकार स्थापन करेल असा विश्वास शीर्षस्थ नेत्यांना, ज्योतिषांना वाटत असला तरी बेसावध राहून अंगलट येणारी खेळी नको, असे प्रयत्न सुरू आहेत. कागदावरची गणितं मांडली जात आहेत.

सट्टाबाजारात राजस्थानच्या फलोदीचे स्थान वेगळं असल्याचं म्हंटलं जातं. प बंगालच्या मतदानानंतर सट्टाबाजारात अचानक उसळी आली. भाजपचा भाव पुन्हा वाढला तर काँग्रेसचा स्थिर असलेला भाव झपाट्याने खाली पडला. बंगालचे निकाल धक्कादायक असतील असं सांगत सटोडियांनी दोन विभागात सट्टा लावलाय. त्यांच्या मते चांगल्या मतदानामुळे ‘ममता पार्टी’च्या जागा कमी होतील. तर काहींनी हा केंद्र सरकारच्या विरोधातील आक्रोशाचा परिणाम ठरवला आहे असं सांगत जादा पैसा लावलाय.

 

फलोदी बाजारानुसार हे जास्तीचं मतदान म्हणजे भाजपची पुर्वानुमानीत २७० जागांवरून ३००हून जास्तीच्या जागांची झेप तर सुरतच्या सट्टाबाजारानुसार उ. प्र., म. प्र.मध्ये भाजपला मोठा फटका बसणार आहे. यातून रालोआला २३५ जागांवर समाधान मानावे लागेल. या फलोदी बाजाराने पाचव्या टप्यापर्यंत रालोआला २७० ते २८० जागा दिल्या होत्या तर आता ३०० चा अंदाज वर्तवला आहे. सुरत बाजाराने सहावा टप्पा झाल्यावरही २३५ ते२४५ जागा मिळतील असं म्हंटलंय. दिल्लीचा सट्टाबाजार मात्र सायंकाळनंतर भाजपला फायदा होईल म्हणत पैसा काढून घेताना दिसला. भाजपला सातपैकी सहा तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा देऊ केलीय. चार वाजेपर्यंत इथे भाजपला २७ पैसे तर काँग्रेसला १७ पैसे नि आपला ३ पैसे भाव होता. पुढे यात बदल होत, भाजपला पूर्ण पसंती दर्शवत, काँग्रेसला १३ पैसे देत आपवर कोणी बोलीदेखील लावली नाही.

असं सांगितलं जातं की ही लोकसभेची पहिली निवडणूक आहे, ज्यात भाजपनंतर प्रादेशिक पक्षांवर जास्त भाव लावला जात आहे. काँग्रेसला मात्र त्यानंतरची पसंती आहे. काँग्रेसच्या जागा शंभरपर्यंत जातील पण त्यापुढे किती यावर भाव खेळला जात नाही. दिल्लीत मतदान संपल्यावर सर्व सात जागा भाजपला मिळतील असं सांगत नुकसान सोसत आपला पैसा सटोड्यानी काढून घेतला. पूर्ण मतदानाआधी पक्षावर लावलेला पैसा काढून घेण्याची बहुधा पहिली वेळ असावी असं फलोदी बाजाराचं म्हणणं आहे. यावरून आप दिल्लीत तोंडावर आपटली असं निरीक्षकाना वाटतं.

राजस्थानच्या फलोदी सट्टाबाजाराला आशिया खंडात वेगळा दर्जा आहे. पाचव्या टप्प्यातील अंदाजानुसार भाजपला २४०-२४५ तर एकूण रालोआला मिळून ३२०-३२५ जागा मिळतील. येथील विधानसभा निवडणुकीत त्याची भविष्यवाणी जवळपास बरोबर ठरली होती. राजस्थानात भाजपला २१-२२ तर काँग्रेसला ३-४ जागा मिळतील. जोधपुरात भाजपाचे गजेंद्र सिंह, बिकानेरमधून अर्जुन मेघवाल, नागौर येथून लोजपाचे हनुमान बेनिवाल तर बाडमेरमधून काँग्रेसचे मानवेंद्र सिंह जिकंतील असे सांगितले जाते. या चार जागा येथील ‘हॉट’ मानल्या जातात.
घटमांडणी

यंदा ७ मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी काय सांगते ते जाहीर झालं. त्यानुसार मोदी सत्तास्थानी कायम राहणार आहेत. यावरून मोदींना हटवायला देव पाण्यात घालून बसलेल्याचे देव पाण्यातच राहणार हे स्पष्ट झालंय. राजा बदलणार असं भाकीत २०१४ च्या निवडणुकीत आलं होतं. त्यावेळी अक्षयतृतीया दोन मे रोजी तर निकाल १६ मे रोजी लागणार होते. ते भाकीत होतं राजा बदलणार, त्यावरील. देशावरील संकटं कायम राहणार तेही आपण अनुभवलं. उरी, अलीकडचा पुलवामा हल्ला २०१४ चा काश्मीर पूर, त्यानंतर सातत्याने लष्करावर होणारे हल्ले, नोटबंदी, त्यातून निर्माण झालेली आर्थिक मंदी, २०१८ चा केरळचा महापूर, देशभरात दुष्काळी परिस्थिती, पुरस्कार वापसी, जेएनयु वाद, देश छोडो, येमुला नि उ. प्र.तील गोमांस प्रकरण, राफेल भ्रष्टाचार, अशा या ना त्या कारणाने वादविवाद, तंटेबखेडे होतंच राहिले. देशातील वातावरण ढवळून निघालं.

 

भेंडवळची भाकिते अंधश्रद्धा म्हणणारे यावर कधी बोलणार? जे सांगितलं जातं, तसं काही प्रमाणात तरी होतं हे समोर आलं आहे. याला नेमकं काय म्हणणार? विज्ञानदेखील चुकतंय हेही आपण पाहतो. तर काही प्रमाणात इथे भाकिते चुकतात. यावरून सगळंच खोटं ठरवण्यात काय हशील? ही तर ३५० वर्षांची परंपरा!

कोण येणार भाजपबरोबर?

भाजपचे काही नेते नि मित्रपक्षदेखील अंदाज वर्तवताना दिसतात की यावेळी पूर्ण बहुमताचा ‘जादुई आकडा’ भाजप गाठू शकणार नाही. सुब्रमण्यम स्वामी, राम माधव, संजय राऊत आदींनी असं भाकीत केलंय तर अशा स्थितीत कोण येणार भाजपाबरोबर? यावेळी भाजपाने उ. प्र., बिहार, पंजाब, महाराष्ट्र, तमिळनाडू यासह पूर्वोत्तर राज्यात मित्रपक्षांसह तर इतर राज्यात स्वबळावर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. २०१४ च्या निवडणुकीत २७ पक्षांना घेऊन लढणाऱ्या भाजपाने २८२ तर ३३६ जागा रालोआने मिळवल्या. पुढे टीडीपी, आरएलएसपी हे दोन वेगळे झाले.

यावेळी स्थिती निराळी असून वेगवेगळ्या राज्यात विरोधी पक्ष भाजपसमोर आव्हान ठेऊन आहे. काँग्रेसनेही मागच्यापेक्षा आपली स्थिती मजबूत केलीय. त्यामुळे बहुमत न मिळाल्यास काँग्रेसविरोधातील कोण आपल्याकडं येईल याची चाचपणी झालीय. आंध्रमधील जगन मोहन रेड्डींच्या वाय. एस. आर. काँग्रेसवर लक्ष आहे. हा पक्ष यंदा चांगली कामगिरी करेल असं मानलं जातं. विशेष राज्याचा दर्जा ही मागणी पूर्ण करणाऱ्यास समर्थन देण्याचं त्यांनी जाहीर केलंय. काँग्रेससमवेत असलेला विवाद पाहता भाजपला इथे आशा आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर याकडे पाहून भाजपा डोळा मारण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारला मदत करताना महत्त्वाच्या निवडणुकीत रालोआला त्यांनी मदत केलीय. काँग्रेस हा शत्रू असून सरकारमध्ये सामील न होता त्यांचा बाहेरून पाठिंबा मिळू शकतो.

ओडिशातील नवीन पटनायक यांची ‘बीजेडी’ वेळोवेळी या सरकारसह दिसली आहे. काँग्रेसशी असलेला ‘छत्तीस’चा आकडा पाहता त्यांचा पाठिंबा मिळू शकेल. पण, भाजपाने तीव्रतेने इथे निवडणूक लढली आहे हे पाहता मैत्रीची शक्यता धूसर दिसत आहे. मोदींचे मंत्री म्हणून काम केलेले बिहारमधील उपेंद्र कुशवाह महागठबांधनात असले तरी कामी येऊ शकतील. तेथील मुकेश साहनी, जीतनराम मांझी, हरियाणातील ओमप्रकाश चौटाला यांची ईनेलो यासाठीही प्रयत्न होतील. एकूणच बहुमत न मिळाल्यास भाजपाकडून मिळणाऱ्या खिरापतीवर वरच्या पक्षप्रमुखांच लक्ष असेल नि हाकेला ‘ओ’ देतील असं म्हंटलं जातं. पाहू.. घोडामैदान जवळ येतंय. कळेलच काय होईल ते! तोपर्यंत चर्चा करा, अंदाज सांगत राहा.. आपलं काम संपलं, लोकशाही जगेलंच!”
 
 

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content