Details
मुस्लीम धर्मीयांचा पवित्र समजला जाणारा रमझानचा महिना आजपासून सुरू झाला. या महिन्याचा शेवट रमझान ईदमध्ये होतो. या महिन्यानिमित्त मुस्लीम समाजाचे लोक पहाटे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. त्याला रोजा म्हणतात. या काळात ते पाणीही पित नाहीत. इतकेच नव्हे तर स्वतःची थुंकीही गिळत नाहीत. सूर्यास्तानंतर ते आपापल्या कुटुंबियांसमवेत उपवास (रोजा) सोडतात. याच काळात ते दिवसातून अनेकदा मशिदीत जाऊन नमाज पडतात.
“रोजा सोडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत या समाजाचे लोक विविध वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे मुस्लीम मोहल्ल्यातील बाजारपेठा रमझानच्या काळात संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत गर्दीने फुललेल्या असतात. दक्षिण मुंबईतल्या भेंडीबाजार, पायधुनी, डोंगरी, मिनारा मस्जीद परिसरात तर चालणे कठिण असते. परंतु कोरोनाच्या साथीमुळे सध्या या परिसराचे चित्र असे दिसत आहे. रमझानमध्ये सर्व प्रार्थना लोकांनी घरीच कराव्यात. सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे जाहीर आवाहन मुस्लीम समाजाच्या अनेक मौलवींनी केले आहे. या आवाहनाचे पालन करताना रमझानच्या महिन्यात या परिसरात गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा मुंबई महापालिका प्रशासन करत आहे.”

