Homeमाय व्हॉईसअल्पसंख्याक-दलित विरोधात गेल्यानंतरही...

अल्पसंख्याक-दलित विरोधात गेल्यानंतरही ८२ हजाराचे मताधिक्य!

धार्मिक ध्रुवीकरण करत यावेळी निवडणुका लढल्या गेल्या आणि त्याचा अनुभव देशाने घेतला. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळेच ८२ हजाराचे मताधिक्य मिळाले हे माझ्या कामाचे फलित आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी दापोली येथील आभार सभेत कृतज्ञता व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले असले तरी काही मतदारसंघात आघाडी कमी मिळाली आहे. मात्र याची जी कारणे आहेत त्याचा विचार करुन पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकीत उतरायचे आहे. आपले उद्दिष्ट फक्त विधानसभा निवडणूक असता कामा नये तर आपल्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पदावर बसवत नाही तोपर्यंत काम थांबवायचे नाही, असे तटकरे म्हणाले.

सर्वंकष नेत्यांचे पाठबळ या रायगड लोकसभा मतदारसंघात मला जसे लाभले तसे सर्वाधिक महिला मतदारांनी माझ्या विजयात तितकाच मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच घासून नाही तर ठासून निवडून आलो. कमी मताधिक्य जरी मिळाले असले तरी या मतदारसंघात काकणभर सरस काम केले जाईल असा शब्द त्यांनी दिला. जे समाजघटक या लोकसभा निवडणुकीत आपल्यापासून दूर गेले आहेत त्यांना आपल्याकडे नक्कीच आणण्याचा प्रयत्न करु आणि येणाऱ्या आव्हानाला ताकदीने सामोरे जाऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content