Tuesday, September 17, 2024
Homeमाय व्हॉईससुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला...

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला ४ वर्षं, मात्र सीबीआय गप्पच!

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्षं झाली. परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज मुंबईत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.

भारतीय जनता पार्टीने सुशांतच्या आत्महत्त्येला हत्त्येचे रुप देऊन आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला. परंतु तपासाला चार वर्षे झाली तरी सीबीआय यावर गप्प आहे. भाजपाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, असे ते म्हणाले.

सुशांत

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्त्येचेही भाजपाने राजकारण केले. सुशांतसिंह याने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले होते. अत्यंत प्रथितयश म्हणून मान्यताप्राप्त अशा एम्स या संस्थेनेही त्यांच्या अहवालात आत्महत्त्याच असल्याचे स्पष्ट केले. त्याला आता १४०० दिवस उलटले आहेत. भाजपाने केवळ हीन राजकीय हेतूने मुंबई पोलीस, मविआ सरकारची बदनामी केली व सुशांतसिंहच्या कुटुंबियांनाही वेठीस धरले. तीन-तीन तपासयंत्रणांचा वापर करण्यात आला. अनेकांचा तपासात छळही केला.
सुशांतसिंहप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सीबीआयला तोंड उघडायला लावावे, अशी विनंती सुशांतच्या मोठ्या बहिणीने केली आहे. परंतु अद्याप मोदींनी या प्रकरणी ना हस्तक्षेप केला ना सीबीआयचे तोंड उघडले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्त्येस आज १४६० दिवस झाले. पण सीबीआय तोंड कधी उघडणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

सुशांतसिंह राजपूतप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि मविआ सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा राजकीय डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा याकरिता वापर केला गेला. भाजपाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले. बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला. मविआ सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनिती आखून भाजपासंचालित वृत्तवाहिन्यांना सुशांतसिंहचा खून झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजपाच्या आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट तयार करून अपप्रचार केला, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला.

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content