Homeमुंबई स्पेशलमुंबईत २२७ जागांसाठी...

मुंबईत २२७ जागांसाठी १७०० उमेदवार!

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेत काल शुक्रवारी एकूण ४५३ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍यात आली त्यामुळे आता मुंबईतल्या २२७ प्रभागांसाठी १ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक चिन्‍हाचे वाटप करण्यात आले. आजच या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले. नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अंतिम दिवसापर्यंत म्‍हणजेच ३० डिसेंबरपर्यंत एकूण २ हजार ५१६ उमेदवारीअर्ज दाखल झाले. ३१ डिसेंबरला या अर्जांची छाननी करण्‍यात आली. त्यात १६७ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली. उमेदवारीअर्ज मागे घेण्याची मुदत काल शुक्रवारी संपली. या कालावधीत ४५३ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍यात आली. माघारीअंती स्‍पष्‍ट झालेल्‍या चित्रानुसार, १ हजार ७०० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

मुंबई

निवडणूक निर्णय कार्यालय / माघार घेतलेल्‍या नामनिर्देशन पत्रांची संख्‍या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्‍या याची माहिती पुढीलप्रमाणे-

१) ए + बी + ई विभाग (RO २३) – १९ / ९२

२) सी + डी विभाग (RO २२) – ०५ / ४४

3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) – २१ / ५०

४) जी दक्षिण विभाग (RO २०) – १४ / ५१

५) जी उत्‍तर विभाग (RO १९) – १८ / १०९

६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) – २५ / ९३

७) एल विभाग (RO १७) – २० / ७६

८) एल विभाग (RO १६) – २४ / ७४

९) एम पूर्व विभाग (RO १५) – ४१ / १२१

१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) – ४४ / ९७

११) एन विभाग (RO १३) – ३४ / ८८

१२) एस विभाग (RO १२) – १५ / ७०

१३) टी विभाग (RO ११) – २४ / ७९

१४) एच पूर्व विभाग (RO १०) – २५/ ८७

१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) – १२ / ५८

१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) – १८ / ८२

१७) के पश्चिम विभाग (RO ७) – १८ / १०४

१८) पी दक्षिण विभाग (RO ६) – १४ / ५६

१९) पी पूर्व विभाग (RO ५) – २१ / ८१

२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) – ११ / ६०

२१) आर दक्षिण विभाग (RO ३) – १० / ८३

२२) आर मध्‍य विभाग (RO २) – ०७ / ३५

२३) आर उत्‍तर विभाग (RO १) – १३ / ३९

एकूण – ४५३/ १७००

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content