Homeमुंबई स्पेशलमुंबईत २२७ जागांसाठी...

मुंबईत २२७ जागांसाठी १७०० उमेदवार!

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेत काल शुक्रवारी एकूण ४५३ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍यात आली त्यामुळे आता मुंबईतल्या २२७ प्रभागांसाठी १ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक चिन्‍हाचे वाटप करण्यात आले. आजच या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले. नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अंतिम दिवसापर्यंत म्‍हणजेच ३० डिसेंबरपर्यंत एकूण २ हजार ५१६ उमेदवारीअर्ज दाखल झाले. ३१ डिसेंबरला या अर्जांची छाननी करण्‍यात आली. त्यात १६७ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली. उमेदवारीअर्ज मागे घेण्याची मुदत काल शुक्रवारी संपली. या कालावधीत ४५३ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍यात आली. माघारीअंती स्‍पष्‍ट झालेल्‍या चित्रानुसार, १ हजार ७०० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

मुंबई

निवडणूक निर्णय कार्यालय / माघार घेतलेल्‍या नामनिर्देशन पत्रांची संख्‍या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्‍या याची माहिती पुढीलप्रमाणे-

१) ए + बी + ई विभाग (RO २३) – १९ / ९२

२) सी + डी विभाग (RO २२) – ०५ / ४४

3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) – २१ / ५०

४) जी दक्षिण विभाग (RO २०) – १४ / ५१

५) जी उत्‍तर विभाग (RO १९) – १८ / १०९

६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) – २५ / ९३

७) एल विभाग (RO १७) – २० / ७६

८) एल विभाग (RO १६) – २४ / ७४

९) एम पूर्व विभाग (RO १५) – ४१ / १२१

१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) – ४४ / ९७

११) एन विभाग (RO १३) – ३४ / ८८

१२) एस विभाग (RO १२) – १५ / ७०

१३) टी विभाग (RO ११) – २४ / ७९

१४) एच पूर्व विभाग (RO १०) – २५/ ८७

१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) – १२ / ५८

१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) – १८ / ८२

१७) के पश्चिम विभाग (RO ७) – १८ / १०४

१८) पी दक्षिण विभाग (RO ६) – १४ / ५६

१९) पी पूर्व विभाग (RO ५) – २१ / ८१

२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) – ११ / ६०

२१) आर दक्षिण विभाग (RO ३) – १० / ८३

२२) आर मध्‍य विभाग (RO २) – ०७ / ३५

२३) आर उत्‍तर विभाग (RO १) – १३ / ३९

एकूण – ४५३/ १७००

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content