Homeब्लॅक अँड व्हाईटनाशिकच्या राष्ट्रीय युवा...

नाशिकच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात 15 तरुणांचा सन्मान!

27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी नाशिकमधील हनुमान नगर येथील महायुवा ग्राम येथे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2021च्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री, निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते देशभरातील पंधरा तरुणांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी युवा कार्य मंत्रालयाच्या संचालिका वनिता सूद, युवा कार्य मंत्रालयाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

युवा

राष्ट्रीय युवा पुरस्कार 15 ते 29 वयोगटातील व्यक्तींना राष्ट्रीय किंवा समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो. तरुणांमध्ये समाजाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे, जबाबदार नागरिक म्हणून वैयक्तिक वाढीस चालना देणे, हे या पुरस्काराचे उद्दीष्ट आहे.

राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे–

1. अधी दैव (17), गुरुग्राम, हरियाणा

2. अंकित सिंग (29), छतरपूर, मध्य प्रदेश

3. बिसाथी भारत (28), अनंतपुरम, आंध्र प्रदेश

4. केवल किशोरभाई पावरा (27, बोताड, गुजरात

5. पल्लवी ठाकूर (२६), पठाणकोट, पंजाब

6. प्रभात फोगट (25), झज्जर, हरियाणा

7. राम बाबू शर्मा (28), जयपूर, राजस्थान

8. रोहित कुमार (29), चंदीगड

9. साक्षी आनंद (२६), पाटणा, बिहार

10. सम्राट बसाक (28), धलाई, त्रिपुरा

11. सत्यदेव आर्य (30), बरेली, उत्तर प्रदेश

12. वैष्णवी श्याम गोतमारे (26), अकोला, महाराष्ट्र

13. विधी सुभाष पलसापुरे (26), लातूर, महाराष्ट्र

14. विनिशा उमाशंकर (17), तिरुवन्नमलाई, तामिळनाडू

15. विवेक परिहार, उधमपूर, जम्मू आणि काश्मीर

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content