HomeArchiveसावध ऐका हृदयाच्या...

सावध ऐका हृदयाच्या हाका!

Details
सावध ऐका हृदयाच्या हाका!

    02-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
विनोद साळवी..
  
 
हृदयी वसंत फुलताना.. हे हृदयाविषयीचे आपले अपार, प्रेम आणि भाव आहेत. या हृदयाचे ठोके बंद पडले की माणूस नावाचं यंत्र थांबलंच. मग, तुम्ही-आम्ही कितीही पाषाणहृदयी असलो तरीही. आज बदलत्या जीवनशैलीत आपलं हृदय जपणं, सांभाळणं हे मोठं आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे. आपल्या लाईफलाईनची मुदत किती याच अंदाज कुणालाच नाही. मानसिक ताणतणावाची दैनंदिनी आपणच लिहित असतो. आपल्या तरूण भारताचंही असंच काहीसं झालं आहे. इथे आरोग्य भीषण समस्या बनली असून गरीब असो वा श्रीमंत, शहरी असो वा ग्रामीण सर्वांना दुखणं सारखचं. वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची गाडी बिघडत असल्याचा अनुभव प्रत्येकजण कथन करतो. पण, आता चाळीशीच्या आत अगदी १८व्या वर्षीही कमजोर हृदयाने दगा द्यावा, हे वास्तव.

 
आण्या-नाण्यांच्या अन् रूपये लाखांच्या जमान्यात मानवी गरजा कमी होत्या अन् आयुष्याचा सेन्सेक्स वाढीव होता. परंतु, आता खरबो-अरबोपतींच्या जमान्यात माणूस धनदौलतीने लाख संपन्न असला तरी त्याला आरोग्याचं बघून मोजकाच घास खावा लागत आहे. या बदलत्या जीवनशैलीने वयाचं अर्धशतक झळकावणंही आजच्या काळात फार मोठी मजल मानावी. कारण आपल्या देशात ५० टक्के लोक हृदयविकाराच्या झटक्याने आपली लाईफलाईन गमावतात. काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या हैदराबाद येथील एका संवाद कार्यक्रमात हृदयविकाराविषयक अनेक गोष्टींवर असाच प्रकाशझोत टाकण्यात आला. आपल्या तरूण भारतात ज्या वयात आजी-आजोबांकडून अनुभवाचे चार बोल ऐकण्याचं वय असतं त्या वयात ती व्यक्ती वार्धक्याकडे झुकलेल्या आजी-आजोबांसमवेत आपल्या अशक्त हृदयावर उपचार घेते. अगदी तिशीतच आपल्या हृदयाचं डामाडोल सुरू व्हावं. काल-परवा हसतखेळत दिसणारा माणूस दुसर्यार दिवशी मृत्यूशय्येवर झोपलेलं पाहवं. यावरून भारतीयांना हृदय व काळजाची किती बारीक काळजी वर्तमानात अन् भविष्यात घ्यावी, याचा अंदाज यावा.
 
 
आपल्या देशात ४० टक्के लोकांना हृदयासंबंधी आजारांनी ग्रासले आहे तेही अगदी वयाच्या पन्नाशीत. हाय बीपी, शूगर, कॉलेस्ट्रॉल या सर्व तक्रारींचं दर चार-सहा महिन्यांनी येणारं रिपोर्ट कार्ड पाहून हृदयाची धडधड आणखीनच वाढावी. हे हार्ट फेल्युअर म्हणजे काय बुवा, हा प्रश्न हृदयाला फुलासारखं जपणार्या प्रत्येकाला पडावा. रक्तपुरवठा, ऑक्सिजन आणि हृदयाच्या हालचाली यात काही तरी बिघाड होतो म्हणे. पहिला झटका, दुसरा झटका आणि तिसरा झटका या मृत्यूच्या पायर्यांघचं मोजमाप करावं. ज्यांना हृदयासंबंधी विकार आहे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यास लागलीच उपाय योजावेत, हेच लाईफलाईन वाढवण्याचे साधन. खेळणं-रांगणं, हुंदडणं, बागडणं हा काहींच्या बाल्यावस्थेतील आनंदाचा क्षण. पण, हे दिवस झुलायचे अन् झोपळ्यावर बसून डुलायचे असले तरी त्याच दिवसांत आपल्या पाल्याच्या हातात आलेलं मोबाइलरूपी खेळणं पाहता त्याचंही हृदय जपा, काळजी घ्या, हे तज्ज्ञ डॉक्टर आग्रहाने सांगत आहेत. शाळा, क्लास, टीव्ही, मोबाईल गेम्स यात अडकून पडलेल्या आपल्या पाल्याला आपणच बाहेर काढावं. दिवसातून किमान तासभर तरी त्याला मैदानी खेळात रमू द्यावं, हा सल्ला डॉक्टरांचा. 
 
 

 

 
आजघडीला आपल्या आणि मुलांच्या जीवनातील खेळाचं महत्त्व बर्यााच अंशी घटलं आहे. घर-कार्यालय-बस-बाईक-कार यातून चढउतार करून आपण एका बैठ्या अन् झोपाळू जीवनशैलीचा स्वीकार केला आहे. अगदी आपल्या मुलांबाबत शाळेत दाखल करताना ही शाळा मुलांकडून चांगला अभ्यास करवून घेते, या गुणांवर भाळतो. परंतु, आपल्या पाल्याच्या मनाची व शरीराची मशागत खेळून-रांगून व्हावी, हे आपण का दुर्लक्षित करावं? बदलत्या जीवनशैलीत लहान असो वा थोर किती चालण्यात, खेळण्यात किती सक्रीय आहे, याचा लेखाजोखा आपण प्रत्येकाने घ्यावा, हा निर्वाणीचा सल्ला तज्ज्ञ देतच असतात. अन् सावध ऐका हृदयाच्या हाका! हे गणित आपल्या जीवनशैलीत पाळावे हेही सांगतात. अगदी सिगारेट, दारू हे ताणतणावावर मात करण्यासाठी काहींसाठी जालीम उपाय आहेत. आज आपल्या देशात ८ ते १० लाख लोकांना हृदयविकाराने ग्रासल्याचे आकडेवारी सांगते. आता आपणच बदललेलं हे जीवनचक्र, दिनमान भेदण्याचं, बदलण्याचं काम आपण नाही तर कोण करणार?”

 

 
 
विनोद साळवी..
  
 
“हृदयी वसंत फुलताना.. हे हृदयाविषयीचे आपले अपार, प्रेम आणि भाव आहेत. या हृदयाचे ठोके बंद पडले की माणूस नावाचं यंत्र थांबलंच. मग, तुम्ही-आम्ही कितीही पाषाणहृदयी असलो तरीही. आज बदलत्या जीवनशैलीत आपलं हृदय जपणं, सांभाळणं हे मोठं आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे. आपल्या लाईफलाईनची मुदत किती याच अंदाज कुणालाच नाही. मानसिक ताणतणावाची दैनंदिनी आपणच लिहित असतो. आपल्या तरूण भारताचंही असंच काहीसं झालं आहे. इथे आरोग्य भीषण समस्या बनली असून गरीब असो वा श्रीमंत, शहरी असो वा ग्रामीण सर्वांना दुखणं सारखचं. वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची गाडी बिघडत असल्याचा अनुभव प्रत्येकजण कथन करतो. पण, आता चाळीशीच्या आत अगदी १८व्या वर्षीही कमजोर हृदयाने दगा द्यावा, हे वास्तव.”

 
“आण्या-नाण्यांच्या अन् रूपये लाखांच्या जमान्यात मानवी गरजा कमी होत्या अन् आयुष्याचा सेन्सेक्स वाढीव होता. परंतु, आता खरबो-अरबोपतींच्या जमान्यात माणूस धनदौलतीने लाख संपन्न असला तरी त्याला आरोग्याचं बघून मोजकाच घास खावा लागत आहे. या बदलत्या जीवनशैलीने वयाचं अर्धशतक झळकावणंही आजच्या काळात फार मोठी मजल मानावी. कारण आपल्या देशात ५० टक्के लोक हृदयविकाराच्या झटक्याने आपली लाईफलाईन गमावतात. काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या हैदराबाद येथील एका संवाद कार्यक्रमात हृदयविकाराविषयक अनेक गोष्टींवर असाच प्रकाशझोत टाकण्यात आला. आपल्या तरूण भारतात ज्या वयात आजी-आजोबांकडून अनुभवाचे चार बोल ऐकण्याचं वय असतं त्या वयात ती व्यक्ती वार्धक्याकडे झुकलेल्या आजी-आजोबांसमवेत आपल्या अशक्त हृदयावर उपचार घेते. अगदी तिशीतच आपल्या हृदयाचं डामाडोल सुरू व्हावं. काल-परवा हसतखेळत दिसणारा माणूस दुसर्यार दिवशी मृत्यूशय्येवर झोपलेलं पाहवं. यावरून भारतीयांना हृदय व काळजाची किती बारीक काळजी वर्तमानात अन् भविष्यात घ्यावी, याचा अंदाज यावा.”
 
 
“आपल्या देशात ४० टक्के लोकांना हृदयासंबंधी आजारांनी ग्रासले आहे तेही अगदी वयाच्या पन्नाशीत. हाय बीपी, शूगर, कॉलेस्ट्रॉल या सर्व तक्रारींचं दर चार-सहा महिन्यांनी येणारं रिपोर्ट कार्ड पाहून हृदयाची धडधड आणखीनच वाढावी. हे हार्ट फेल्युअर म्हणजे काय बुवा, हा प्रश्न हृदयाला फुलासारखं जपणार्या प्रत्येकाला पडावा. रक्तपुरवठा, ऑक्सिजन आणि हृदयाच्या हालचाली यात काही तरी बिघाड होतो म्हणे. पहिला झटका, दुसरा झटका आणि तिसरा झटका या मृत्यूच्या पायर्यांघचं मोजमाप करावं. ज्यांना हृदयासंबंधी विकार आहे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यास लागलीच उपाय योजावेत, हेच लाईफलाईन वाढवण्याचे साधन. खेळणं-रांगणं, हुंदडणं, बागडणं हा काहींच्या बाल्यावस्थेतील आनंदाचा क्षण. पण, हे दिवस झुलायचे अन् झोपळ्यावर बसून डुलायचे असले तरी त्याच दिवसांत आपल्या पाल्याच्या हातात आलेलं मोबाइलरूपी खेळणं पाहता त्याचंही हृदय जपा, काळजी घ्या, हे तज्ज्ञ डॉक्टर आग्रहाने सांगत आहेत. शाळा, क्लास, टीव्ही, मोबाईल गेम्स यात अडकून पडलेल्या आपल्या पाल्याला आपणच बाहेर काढावं. दिवसातून किमान तासभर तरी त्याला मैदानी खेळात रमू द्यावं, हा सल्ला डॉक्टरांचा. ”
 
 

 

 
“आजघडीला आपल्या आणि मुलांच्या जीवनातील खेळाचं महत्त्व बर्यााच अंशी घटलं आहे. घर-कार्यालय-बस-बाईक-कार यातून चढउतार करून आपण एका बैठ्या अन् झोपाळू जीवनशैलीचा स्वीकार केला आहे. अगदी आपल्या मुलांबाबत शाळेत दाखल करताना ही शाळा मुलांकडून चांगला अभ्यास करवून घेते, या गुणांवर भाळतो. परंतु, आपल्या पाल्याच्या मनाची व शरीराची मशागत खेळून-रांगून व्हावी, हे आपण का दुर्लक्षित करावं? बदलत्या जीवनशैलीत लहान असो वा थोर किती चालण्यात, खेळण्यात किती सक्रीय आहे, याचा लेखाजोखा आपण प्रत्येकाने घ्यावा, हा निर्वाणीचा सल्ला तज्ज्ञ देतच असतात. अन् सावध ऐका हृदयाच्या हाका! हे गणित आपल्या जीवनशैलीत पाळावे हेही सांगतात. अगदी सिगारेट, दारू हे ताणतणावावर मात करण्यासाठी काहींसाठी जालीम उपाय आहेत. आज आपल्या देशात ८ ते १० लाख लोकांना हृदयविकाराने ग्रासल्याचे आकडेवारी सांगते. आता आपणच बदललेलं हे जीवनचक्र, दिनमान भेदण्याचं, बदलण्याचं काम आपण नाही तर कोण करणार?”

हृदयमानसिक ताणतणावजीवनशैलीहाय बीपीशूगरकॉलेस्ट्रॉलहार्ट फेल्युअरसिगारेटदारू

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content