Details
“विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालीच सरकार बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र, तसा दावा त्यांनी राज्यपालांकडे केला नाही आणि काँग्रेसच्या नेते लगेचच सक्रीय झाले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आदींनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सिल्व्हर ओक, हे मुंबईतले निवासस्थान गाठले. शिवसेनेचे नेते संजय राऊतही तेथे उपस्थित होते. तेथे किमान दीड तास चर्चा केल्यानंतर काँग्रेसचे नेते प्रसिद्धीमाध्यमांसमोर व्यक्त झाले. राज्यपाल कोणता निर्णय घेतात याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले.”
छायाचित्रेः भूषण कोयंडे

