HomeArchiveशिवनेरकार विश्वनाथराव वाबळे...

शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराने १२ ज्येष्ठ पत्रकार सन्मानित!

Details
शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराने १२ ज्येष्ठ पत्रकार सन्मानित!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी १२ ज्येष्ठ पत्रकारांना `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

`शिवनेर’कार वाबळे क्रीडाप्रेमी होते. बुद्धिबळ हा त्यांचा आवडता खेळ. यादृष्टीने शिवनेर, सावतमाळी भुवन ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्टस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांची जलद बुद्धिबळ स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 48 मुला-मुलींनी भाग घेतला. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे वितरण मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय बरदाडे व रामिम संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत: सूर्यकांत फातर्फेकर, संदीप चव्हाण, प्रसाद मोकाशी, स्वाती घोसाळकर, जगदीश भोवड, प्रदीप म्हापसेकर, श्रीकांत नाईक, विजयकुमार बांदल, लीलाधर चव्हाण, सुधाकर काश्यप, संजय परब आणि प्रकाश सावंत. नंदकुमार काटकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांनी तळागाळातील लोकांसाठी पत्रकारिता केली. तोच वारसा आज `शिवनेर’चे संपादक नरेंद्र वि. वाबळे चालवत आहेत, असे ते म्हणाले. सावतामाळी भुवन ट्रस्टचे हेमंत मंडलिक आणि सदानंद पोहेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी `शिवनेर’च्या वतीने संपादक नरेंद्र वि. वाबळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला एक कॅरम बोर्ड, स्टॅण्ड आणि चार बुद्धिबळ सेट भेट दिले. पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी ते स्वीकारले.

 
 
 
 
 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी १२ ज्येष्ठ पत्रकारांना `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

`शिवनेर’कार वाबळे क्रीडाप्रेमी होते. बुद्धिबळ हा त्यांचा आवडता खेळ. यादृष्टीने शिवनेर, सावतमाळी भुवन ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्टस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांची जलद बुद्धिबळ स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 48 मुला-मुलींनी भाग घेतला. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे वितरण मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय बरदाडे व रामिम संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत: सूर्यकांत फातर्फेकर, संदीप चव्हाण, प्रसाद मोकाशी, स्वाती घोसाळकर, जगदीश भोवड, प्रदीप म्हापसेकर, श्रीकांत नाईक, विजयकुमार बांदल, लीलाधर चव्हाण, सुधाकर काश्यप, संजय परब आणि प्रकाश सावंत. नंदकुमार काटकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांनी तळागाळातील लोकांसाठी पत्रकारिता केली. तोच वारसा आज `शिवनेर’चे संपादक नरेंद्र वि. वाबळे चालवत आहेत, असे ते म्हणाले. सावतामाळी भुवन ट्रस्टचे हेमंत मंडलिक आणि सदानंद पोहेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी `शिवनेर’च्या वतीने संपादक नरेंद्र वि. वाबळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला एक कॅरम बोर्ड, स्टॅण्ड आणि चार बुद्धिबळ सेट भेट दिले. पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी ते स्वीकारले.

 
 
 
 
 
 
 
 ”
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content