Details
विधानसभेत डावलल्यास स्वतंत्र मुंबईच्या मागणीचा उठाव – डॉ. भानजी
19-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
कोळी समाजाला स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई, पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी. अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करू, असा इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी नुकताच दिला.
कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ. भानजी यांनी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वीपासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात १९६० मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते. परंतु परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय, असे दिसून येते अशी टीका विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी केली.
२०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देता की जाता’चा नारा दिला आणि काँग्रेस आघाडी सरकार पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमिपुत्रांना खंत आहे असे डॉ. भानजी म्हणाले.
याप्रसंगी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.”
केएचएल न्यूज ब्युरो
“कोळी समाजाला स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई, पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी. अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करू, असा इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी नुकताच दिला.”
“कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ. भानजी यांनी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वीपासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात १९६० मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते. परंतु परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय, असे दिसून येते अशी टीका विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी केली.”
२०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देता की जाता’चा नारा दिला आणि काँग्रेस आघाडी सरकार पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमिपुत्रांना खंत आहे असे डॉ. भानजी म्हणाले.
“याप्रसंगी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.”

