HomeArchiveविठुला लागली थंडी...

विठुला लागली थंडी…

Details
विठुला लागली थंडी…

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

[email protected]

संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत विठोबा. त्याला थंडी लागतेय हे वाचून मोरूने विचार केला-  विठोबा तर दगडाची मूर्ती. त्याला कसली थंडी? मी तर जिता जिवंत माणूस. मला थंडी लागणारच. पण एकदा झोप लागली की थंडीचा परिणाम जाणवत नाही आणि त्या थंडीचा प्रताप सकाळी उठताना चांगलाच जाणवतो. म्हणून मोरूने रात्री झोपताना कानात वारा जाऊ नये म्हणून बापाची जुनी शाल डोक्यावरून कानाला घट्ट गुंडाळली. पायाला भेगा पडू नये म्हणून बुटाचे जुने सॉक्स पायात घातले. घरात शिल्लक राहिलेल्या दुधाची साय तोंडभर चापूनचोपून लावली. कारण विठोबालाही साग्रसंगीत चेहर्‍यावर लेपन केले होते आणि नंतर त्याने अंगावर जाड गोधडी घेऊन तो झोपी गेला.

सकाळी मोरूचा बाप डोळे पुसत उठला. थंडी म्हणून त्याला अंथरूणातून उठावेसे वाटत नव्हते. पण कसाबसा आळस झटकत तो उठला. आळोखे-पिळोखे देत असताना त्याचे लक्ष मोरूच्या तोंडाकडे गेले आणि कानाच्या भोवती शाल पाहताच मोरूच्या कमरेत त्याने लाथ घातली… लाथ जोराने लागल्याने मोरू अक्षरशः कळवळून उठला… आये, आये करत कळवळत बापाला म्हणाला ‘अरे, तू माझा जन्मदाता आहेस की हैवान? लाथ मारून उठवतोस… काही मॅनर्स हाय की नाय? बापाच्या चूक लक्षात येताच तो पाच काळी स्वरातील आवाज दोन काळीमध्ये आणत म्हणाला, ‘हा काय मी तुझा अवतार पाहतोय. कानाला शाल गुंडाळलीस. पायात सॉक्स, काय भानगड आहे…?’  ‘अहो, आपला विठ्ठल, पंढरपूरचा हो,’… मोरू स्वतःची कंबर दाबत दाबत बोलत होता… तर मी काय सांगत होतो माझ्या बापा, त्या विठ्ठलाला पंढरपुरात थंडी भरली म्हणून त्याच्या पुजार्‍यांनी त्याच्या दोन्ही कानात वारा जाऊ नये म्हणून कानावर कानपट्टी बांधून अंगावर शाल व रजई घातली कारण पंढरपुरात थंडी आहे. तिथे तापमानाचा पारा १८ अंशावर आहे… रिस्क नको म्हणून मी कानाला तुमची शाल, पायात सॉक्स आणि अंगावर ही जुनी गोधडी घेतली…’ मोरूने अशाप्रकारे बापाला समजावून सांगितले.

 
‘अरे व्वा छान, पण तोंडाला हे सफेद सफेद काय आहे, क्रीम तर आपल्या घरात नाही… मग हे क्रीम कोठून आणले? बापाने अडचणींचा प्रश्न विचारला. ‘आपल्या घरात अठराविश्व दारिद्र्य, हे ठाऊक असून तरी तुम्ही स्वतःची लाज काढता?’ मोरूने बापाला ठणकावून सांगितले. हे बघा ही काय क्रीम नाही, ही आहे दुधावरची साय! असे मोरूने सांगताच बापाने त्याच्या कानाखाली ‘नकाशा’ काढला… ‘अरे गधड्या, ती साय दह्यासाठी मी साठवून ठेवतो, तुला माहीत नाही का? बापाने पुन्हा हात उचलत सांगत असताना मोरूने बापाचा हात धरला आणि म्हणाला ‘दुधावरची साय म्हणजे आईची माय, अरे माझ्या बापा मला आई नाही म्हणून तुझ्याकडे मी माझी माय म्हणून बघतो, या सायेतही मला माझी माय दिसते… मोरू डोळे चोळत चोळत बोलत होता. मोरूच्या बापाने मोरूला हृदयाशी घट्ट धरले आणि चूक मान्य करत म्हणाला ‘अरे पांडुरंग आपला देव आहे, तो सर्वांचा कल्याणकारी देव आहे… त्याची आपण काळजी करायची नाय तर कोणी?

‘हे बघा मला पटतं, पण कल्याणकारी विठ्ठलाला आषाढी एकादशीला लाखो वारकरी जातात.  त्यांच्या जीवनात काही फरक पडला आहे का? शेतीत राबून त्यांच्या आयुष्याची माती झाली…, मोरू एका झटक्यात बोलून मोकळा झाला. ‘मोरू विठूला असे बोलू नकोस. आज आपण जे आहोत ते त्याच्या कृपेमुळेच’… अरे राजा असे तोंडात येईल ते बडबडू नकोस. मोरूचा बाप असं बोलताच मोरू अंथरूणातून बाहेर आला… ‘विठ्ठलाला थंडी भरली नाही, तर पुजार्‍यांना कामधंदा मिळावा म्हणून ही थेरं चालवली आहेत या पुजार्‍यांनी. थंडी आहे ना, मग जसं उन्हाळ्यात गरम होतं म्हणून एसी लावून थंड वातावरण निर्माण करता येते ना तसे विठ्ठलाचा गाभारा गरम करता येईल. त्यासाठी विठ्ठलाला शाल, गरम कपडे घालण्याची गरज नाही. मोरूने बापाला सुनावले. मोरूचा बाप मोरूचे प्रवचन ऐकत बसला…

मोरूच्या बापाने मोरूच्या कानावरची शाल काढली, सॉक्स काढले. तोंडावरील साय काढत मायेने तो मोरूला खाली घेऊन गेला. रस्त्यावर कामगारांनी शेकोटी पेटवली होती, तिथे त्या कामगारांबरोबर शेकोटी घेत असताना काही अंतरावर काही कामगार विठ्ठलनामाचा गजर करीत होते. मोरूने हळूच बापाला विचारले, ‘त्या कामगारांना थंडी लागत नाही का? मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘विठ्ठलनामाने ते स्वतःला विसरलेत, हीच किमया आहे विठ्ठलनामाची! …समजलं आता.

विठ्ठलनामाने परिसर व्यापून गेला… मोरूही त्यांच्यात सामील झाला… विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल….”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

[email protected]

संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत विठोबा. त्याला थंडी लागतेय हे वाचून मोरूने विचार केला-  विठोबा तर दगडाची मूर्ती. त्याला कसली थंडी? मी तर जिता जिवंत माणूस. मला थंडी लागणारच. पण एकदा झोप लागली की थंडीचा परिणाम जाणवत नाही आणि त्या थंडीचा प्रताप सकाळी उठताना चांगलाच जाणवतो. म्हणून मोरूने रात्री झोपताना कानात वारा जाऊ नये म्हणून बापाची जुनी शाल डोक्यावरून कानाला घट्ट गुंडाळली. पायाला भेगा पडू नये म्हणून बुटाचे जुने सॉक्स पायात घातले. घरात शिल्लक राहिलेल्या दुधाची साय तोंडभर चापूनचोपून लावली. कारण विठोबालाही साग्रसंगीत चेहर्‍यावर लेपन केले होते आणि नंतर त्याने अंगावर जाड गोधडी घेऊन तो झोपी गेला.

सकाळी मोरूचा बाप डोळे पुसत उठला. थंडी म्हणून त्याला अंथरूणातून उठावेसे वाटत नव्हते. पण कसाबसा आळस झटकत तो उठला. आळोखे-पिळोखे देत असताना त्याचे लक्ष मोरूच्या तोंडाकडे गेले आणि कानाच्या भोवती शाल पाहताच मोरूच्या कमरेत त्याने लाथ घातली… लाथ जोराने लागल्याने मोरू अक्षरशः कळवळून उठला… आये, आये करत कळवळत बापाला म्हणाला ‘अरे, तू माझा जन्मदाता आहेस की हैवान? लाथ मारून उठवतोस… काही मॅनर्स हाय की नाय? बापाच्या चूक लक्षात येताच तो पाच काळी स्वरातील आवाज दोन काळीमध्ये आणत म्हणाला, ‘हा काय मी तुझा अवतार पाहतोय. कानाला शाल गुंडाळलीस. पायात सॉक्स, काय भानगड आहे…?’  ‘अहो, आपला विठ्ठल, पंढरपूरचा हो,’… मोरू स्वतःची कंबर दाबत दाबत बोलत होता… तर मी काय सांगत होतो माझ्या बापा, त्या विठ्ठलाला पंढरपुरात थंडी भरली म्हणून त्याच्या पुजार्‍यांनी त्याच्या दोन्ही कानात वारा जाऊ नये म्हणून कानावर कानपट्टी बांधून अंगावर शाल व रजई घातली कारण पंढरपुरात थंडी आहे. तिथे तापमानाचा पारा १८ अंशावर आहे… रिस्क नको म्हणून मी कानाला तुमची शाल, पायात सॉक्स आणि अंगावर ही जुनी गोधडी घेतली…’ मोरूने अशाप्रकारे बापाला समजावून सांगितले.

 
‘अरे व्वा छान, पण तोंडाला हे सफेद सफेद काय आहे, क्रीम तर आपल्या घरात नाही… मग हे क्रीम कोठून आणले? बापाने अडचणींचा प्रश्न विचारला. ‘आपल्या घरात अठराविश्व दारिद्र्य, हे ठाऊक असून तरी तुम्ही स्वतःची लाज काढता?’ मोरूने बापाला ठणकावून सांगितले. हे बघा ही काय क्रीम नाही, ही आहे दुधावरची साय! असे मोरूने सांगताच बापाने त्याच्या कानाखाली ‘नकाशा’ काढला… ‘अरे गधड्या, ती साय दह्यासाठी मी साठवून ठेवतो, तुला माहीत नाही का? बापाने पुन्हा हात उचलत सांगत असताना मोरूने बापाचा हात धरला आणि म्हणाला ‘दुधावरची साय म्हणजे आईची माय, अरे माझ्या बापा मला आई नाही म्हणून तुझ्याकडे मी माझी माय म्हणून बघतो, या सायेतही मला माझी माय दिसते… मोरू डोळे चोळत चोळत बोलत होता. मोरूच्या बापाने मोरूला हृदयाशी घट्ट धरले आणि चूक मान्य करत म्हणाला ‘अरे पांडुरंग आपला देव आहे, तो सर्वांचा कल्याणकारी देव आहे… त्याची आपण काळजी करायची नाय तर कोणी?

‘हे बघा मला पटतं, पण कल्याणकारी विठ्ठलाला आषाढी एकादशीला लाखो वारकरी जातात.  त्यांच्या जीवनात काही फरक पडला आहे का? शेतीत राबून त्यांच्या आयुष्याची माती झाली…, मोरू एका झटक्यात बोलून मोकळा झाला. ‘मोरू विठूला असे बोलू नकोस. आज आपण जे आहोत ते त्याच्या कृपेमुळेच’… अरे राजा असे तोंडात येईल ते बडबडू नकोस. मोरूचा बाप असं बोलताच मोरू अंथरूणातून बाहेर आला… ‘विठ्ठलाला थंडी भरली नाही, तर पुजार्‍यांना कामधंदा मिळावा म्हणून ही थेरं चालवली आहेत या पुजार्‍यांनी. थंडी आहे ना, मग जसं उन्हाळ्यात गरम होतं म्हणून एसी लावून थंड वातावरण निर्माण करता येते ना तसे विठ्ठलाचा गाभारा गरम करता येईल. त्यासाठी विठ्ठलाला शाल, गरम कपडे घालण्याची गरज नाही. मोरूने बापाला सुनावले. मोरूचा बाप मोरूचे प्रवचन ऐकत बसला…

मोरूच्या बापाने मोरूच्या कानावरची शाल काढली, सॉक्स काढले. तोंडावरील साय काढत मायेने तो मोरूला खाली घेऊन गेला. रस्त्यावर कामगारांनी शेकोटी पेटवली होती, तिथे त्या कामगारांबरोबर शेकोटी घेत असताना काही अंतरावर काही कामगार विठ्ठलनामाचा गजर करीत होते. मोरूने हळूच बापाला विचारले, ‘त्या कामगारांना थंडी लागत नाही का? मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘विठ्ठलनामाने ते स्वतःला विसरलेत, हीच किमया आहे विठ्ठलनामाची! …समजलं आता.

विठ्ठलनामाने परिसर व्यापून गेला… मोरूही त्यांच्यात सामील झाला… विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल….”
 

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content