Details
विचारप्रवर्तक चर्चासत्र संपन्न!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च संस्थेचे मानद प्राध्यापक दिलीप एम. नाचणे यांनी अत्यंत अभ्यास पूर्वक लिहिलेल्या “क्रिटिक ऑफ दि न्यू काँसेन्सस मॅक्रोइकॉनॉमिक्स अँड इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया” या ग्रंथावर मुंबई विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या जी. डी. पारेख सेंटरच्या वतीने नुकतंच एक विचारप्रवर्तक चर्चासत्र झालं.
या चर्चासत्रात राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. बर्मन, आदित्य बिर्ला ग्रुपचे मुख अर्थतज्ञ डॉ. अजित रानडे, पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या आरबीआय अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. रोमार कोरिआ, आयडीबीआय बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक डॉ. माधव दातार यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी योजना आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. सरकारची वित्तविषयक धोरणे आणि त्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा बरावाईट परिणाम यावर या ग्रंथानिमित्त सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांच्यासह विविध मान्यवर, अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो
इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च संस्थेचे मानद प्राध्यापक दिलीप एम. नाचणे यांनी अत्यंत अभ्यास पूर्वक लिहिलेल्या “क्रिटिक ऑफ दि न्यू काँसेन्सस मॅक्रोइकॉनॉमिक्स अँड इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया” या ग्रंथावर मुंबई विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या जी. डी. पारेख सेंटरच्या वतीने नुकतंच एक विचारप्रवर्तक चर्चासत्र झालं.
या चर्चासत्रात राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. बर्मन, आदित्य बिर्ला ग्रुपचे मुख अर्थतज्ञ डॉ. अजित रानडे, पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या आरबीआय अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. रोमार कोरिआ, आयडीबीआय बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक डॉ. माधव दातार यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी योजना आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. सरकारची वित्तविषयक धोरणे आणि त्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा बरावाईट परिणाम यावर या ग्रंथानिमित्त सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांच्यासह विविध मान्यवर, अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.”

