HomeArchiveवर्सोवा चौपाटीवर जीवन...

वर्सोवा चौपाटीवर जीवन विद्या मिशनकडून स्वच्छता अभियान

Details
वर्सोवा चौपाटीवर जीवन विद्या मिशनकडून स्वच्छता अभियान

    18-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“”पर्यावरण हाच नारायण व पर्यावरणाची हिच परमेश्वराची उपासना”” या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सद्गुरू बोधास अनुसरून व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून जीवन विद्या मिशनच्या वतीने नुकतेच मुंबईतल्या वर्सोवा, देवाची वाडीच्या समुद्र किनार्यामवर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. 
 
यासाठी जीवनविद्या मिशनच्या मुंबईतील विविध शाखांच्या सुमारे ३०० तरूण-तरूणींनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला. जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, सचिव विवेक बावकर, गिरीश कलव, किशोर शिंदे, संतोष सावंत, प्रमोद रासम, तुषार राणे आदींनी त्यांना मार्गदर्शन केले.
 
मिशनचे कार्यकर्ते जयेश बने, आशिष चव्हाण, तेजस साळवी, करण शेवाळे इत्यादींनी या स्वच्छता अभियानासाठी अथक प्रयत्न केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित के/पश्चिम विभागाच्या घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्यां नी या स्वच्छता अभियानाच्यावेळी किनार्याावरील जमा झालेला कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या जेसीबी, पोक्लेन व लहान आकाराचे ट्रक इ. यंत्र सामुग्रीची व कामगारांना कार्यरत ठेवून मोलाचे सहकार्य केले. यासाठी महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, सहा. अभियंता बांगर व दुय्यम अभियंता शिरसाट यांनी सकारात्मक सहकार्य दिले. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ५९चे शाखाप्रमुख सतीश परब, स्नेहा परब, दर्शना रासम इ. स्थानिक शिवसैनिकांनी भाग घेतलेल्या स्वच्छताग्रहींना नाश्ता दिला.
 

 ”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“””पर्यावरण हाच नारायण व पर्यावरणाची हिच परमेश्वराची उपासना”” या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सद्गुरू बोधास अनुसरून व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून जीवन विद्या मिशनच्या वतीने नुकतेच मुंबईतल्या वर्सोवा, देवाची वाडीच्या समुद्र किनार्यामवर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. ”
 

“यासाठी जीवनविद्या मिशनच्या मुंबईतील विविध शाखांच्या सुमारे ३०० तरूण-तरूणींनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला. जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, सचिव विवेक बावकर, गिरीश कलव, किशोर शिंदे, संतोष सावंत, प्रमोद रासम, तुषार राणे आदींनी त्यांना मार्गदर्शन केले.”
 

“मिशनचे कार्यकर्ते जयेश बने, आशिष चव्हाण, तेजस साळवी, करण शेवाळे इत्यादींनी या स्वच्छता अभियानासाठी अथक प्रयत्न केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित के/पश्चिम विभागाच्या घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्यां नी या स्वच्छता अभियानाच्यावेळी किनार्याावरील जमा झालेला कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या जेसीबी, पोक्लेन व लहान आकाराचे ट्रक इ. यंत्र सामुग्रीची व कामगारांना कार्यरत ठेवून मोलाचे सहकार्य केले. यासाठी महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, सहा. अभियंता बांगर व दुय्यम अभियंता शिरसाट यांनी सकारात्मक सहकार्य दिले. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ५९चे शाखाप्रमुख सतीश परब, स्नेहा परब, दर्शना रासम इ. स्थानिक शिवसैनिकांनी भाग घेतलेल्या स्वच्छताग्रहींना नाश्ता दिला.”
 

 

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content