HomeArchiveराजीवजी, शंकररावजी आणि...

राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..

Details
“राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content