HomeArchiveमुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा...

मुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार!

Details
मुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार!

    20-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
भारतीय जनता पक्षाने मतदारयादीमधील बोगस व दुसऱ्यांदा नावे असलेल्या मतदारांची नावे काढण्याची मागणी केली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. मुंबई शहरामध्ये सुमारे ८६ हजारहून जास्त असे मतदार आहेत ज्यांच्याकडे दोन मताधिकार आहेत किंवा ते नागरिकच नाहीत. अशी नावे तत्काळ हटवण्याची कारवाई केली जावी, असे ते म्हणाले.
 
 
आमदार लोढा यांनी निवडणूक आयोगाला मुंबई शहरामधील ८६ हजार बोगस मतदारांची यादीही सुपूर्द केली आहे. मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये बांग्लादेशी नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची‌ नावेसुद्धा निवडणुकीपूर्वी तत्काळ काढावीत. असेही त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे. 
 
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांच्यासह आयोगाच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी एका भेटीमध्ये लोढा यांनी ही मागणी केली. त्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हंटले की, खऱ्या मतदाराद्वारेच आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्षात असलेल्या नागरिकाद्वारेच आपला प्रतिनिधी निवडला जाणे निरोगी लोकशाहीसाठी आवश्यक आहे. पण, मुंबईत मोठ्या संख्येत खोटे मतदारही मत द्यायला तयार आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांची नावे मतदारयादीमधून काढून टाकणे आवश्यक आहे.
 
मुंबई महानगराच्या विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिकांचीही नावे आहेत असे समजले आहे. तपासल्यावर असे निदर्शनास आले आहे की, मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये सध्या सुमारे ८६ हजारांपेक्षा जास्त अशी नावे आहेत जी एक तर दुसऱ्या अन्य विधानसभा क्षेत्रातही आहेत किंवा स्थानिक नागरिकच नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन बोगस मतदारांची तपासणी करून त्यांची नावे मतदारयादीतून काढणे गरजेचे आहे.
 
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आवश्यक निर्देश देऊन मुंबई शहरातील सर्व बोगस मतदार व अन्य विधानसभा क्षेत्रात नाव असूनही इथे मतदान करणाऱ्यांची नावे काढण्याची कारवाई करावी. दिवाळी सुट्ट्यांच्या आधी निवडणुका करण्याची व युवा मतदारांनी मतदान करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याची मागणीसुद्धा लोढा यांनी केली आहे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“भारतीय जनता पक्षाने मतदारयादीमधील बोगस व दुसऱ्यांदा नावे असलेल्या मतदारांची नावे काढण्याची मागणी केली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. मुंबई शहरामध्ये सुमारे ८६ हजारहून जास्त असे मतदार आहेत ज्यांच्याकडे दोन मताधिकार आहेत किंवा ते नागरिकच नाहीत. अशी नावे तत्काळ हटवण्याची कारवाई केली जावी, असे ते म्हणाले.”
 
 
आमदार लोढा यांनी निवडणूक आयोगाला मुंबई शहरामधील ८६ हजार बोगस मतदारांची यादीही सुपूर्द केली आहे. मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये बांग्लादेशी नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची‌ नावेसुद्धा निवडणुकीपूर्वी तत्काळ काढावीत. असेही त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे. 
 

“मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांच्यासह आयोगाच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी एका भेटीमध्ये लोढा यांनी ही मागणी केली. त्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हंटले की, खऱ्या मतदाराद्वारेच आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्षात असलेल्या नागरिकाद्वारेच आपला प्रतिनिधी निवडला जाणे निरोगी लोकशाहीसाठी आवश्यक आहे. पण, मुंबईत मोठ्या संख्येत खोटे मतदारही मत द्यायला तयार आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांची नावे मतदारयादीमधून काढून टाकणे आवश्यक आहे.”
 

“मुंबई महानगराच्या विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिकांचीही नावे आहेत असे समजले आहे. तपासल्यावर असे निदर्शनास आले आहे की, मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये सध्या सुमारे ८६ हजारांपेक्षा जास्त अशी नावे आहेत जी एक तर दुसऱ्या अन्य विधानसभा क्षेत्रातही आहेत किंवा स्थानिक नागरिकच नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन बोगस मतदारांची तपासणी करून त्यांची नावे मतदारयादीतून काढणे गरजेचे आहे.”
 

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आवश्यक निर्देश देऊन मुंबई शहरातील सर्व बोगस मतदार व अन्य विधानसभा क्षेत्रात नाव असूनही इथे मतदान करणाऱ्यांची नावे काढण्याची कारवाई करावी. दिवाळी सुट्ट्यांच्या आधी निवडणुका करण्याची व युवा मतदारांनी मतदान करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याची मागणीसुद्धा लोढा यांनी केली आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content