HomeArchiveमुंबईच्या विकास आराखडयाच्या...

मुंबईच्या विकास आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचे विशेष पॅकेज आणणार

Details
मुंबईच्या विकास आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचे विशेष पॅकेज आणणार

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचे आश्वासन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज आणण्यासाठी पुढील पाच वर्षांत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात शेवाळे बोलत होते. पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या या वार्तालापापूर्वी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी शेवाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर, कार्यकारिणी सदस्या स्वाती घोसाळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले राहुल शेवाळे पुन्हा एकदा याच मतदारसंघातून महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्यावर आपण कोणत्या कामाला प्राधान्य द्याल, असा प्रश्न पत्रकारांनी राहुल शेवाळे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना शेवाळे म्हणाले, मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट न करता केवळ मुंबई विकास आराखड्याची 100% अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गेल्या वेळेस जो विकास आराखडा मंजूर झाला होता, त्यातील केवळ 7 टक्के आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली. जगातील कोणत्याही देशात विकास आराखड्याची इतकी अल्प अंमलबजावणी होत नसावी. यंदाचा विकास आराखडा तयार झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी 14 लाख 600 कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेला इतका अवाढव्य खर्च शक्य नसल्याने पालिकेने यासाठी केवळ 3400 कोटींची तरतूद केली आहे. या वेगाने आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 100 वर्षांचा अवधी लागेल. म्हणून या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

केंद्र सरकारने मुंबईच्या विकास आराखड्याला निधी दिला तर ती त्यांची गुंतवणूक असेल. कारण मुंबईचा विकास झाला तर केंद्र सरकारलाही मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळू शकेल. यासाठीच 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शेवाळे यांनी स्पष्ट केले. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका या तीनही आस्थापनांनी समन्वय साधणे गरजेचे असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.”
 
“महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचे आश्वासन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज आणण्यासाठी पुढील पाच वर्षांत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात शेवाळे बोलत होते. पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या या वार्तालापापूर्वी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी शेवाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर, कार्यकारिणी सदस्या स्वाती घोसाळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले राहुल शेवाळे पुन्हा एकदा याच मतदारसंघातून महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्यावर आपण कोणत्या कामाला प्राधान्य द्याल, असा प्रश्न पत्रकारांनी राहुल शेवाळे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना शेवाळे म्हणाले, मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट न करता केवळ मुंबई विकास आराखड्याची 100% अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गेल्या वेळेस जो विकास आराखडा मंजूर झाला होता, त्यातील केवळ 7 टक्के आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली. जगातील कोणत्याही देशात विकास आराखड्याची इतकी अल्प अंमलबजावणी होत नसावी. यंदाचा विकास आराखडा तयार झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी 14 लाख 600 कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेला इतका अवाढव्य खर्च शक्य नसल्याने पालिकेने यासाठी केवळ 3400 कोटींची तरतूद केली आहे. या वेगाने आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 100 वर्षांचा अवधी लागेल. म्हणून या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

केंद्र सरकारने मुंबईच्या विकास आराखड्याला निधी दिला तर ती त्यांची गुंतवणूक असेल. कारण मुंबईचा विकास झाला तर केंद्र सरकारलाही मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळू शकेल. यासाठीच 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शेवाळे यांनी स्पष्ट केले. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका या तीनही आस्थापनांनी समन्वय साधणे गरजेचे असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.”
 

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content