HomeArchiveमुंबईच्या प्रगतीत नौदलाचा...

मुंबईच्या प्रगतीत नौदलाचा सिंहाचा वाटा – प्रवीण दीक्षित

Details

 

 

“मुंबई शहराच्या संरक्षणाची जबाबदारी नौदल सांभाळत असल्यामुळे त्यांचा या आर्थिक राजधानीच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.”

“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने भारत सरकारच्या सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल म्हणजेच `सागर’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आयोजित `सागर’शक्ती प्रदर्शनाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केल्याचे प्रशंसोद्गारदेखील त्यांनी याप्रसंगी काढले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नौदलातील नौका, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे तसेच सरक्षणविषयक बाबींची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. यात प्रामुख्याने युवा आणि विद्यार्थी वर्गाचा सहभाग विशेष होता.”

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात असताना सशक्त नौदलाचे पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलंय, त्यामुळे भारतीय नौदलाचा दबदबा जगभरात आहे तसेच आपल्या सागरी सीमादेखील सुरक्षित आहेत, असे स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांनी यावेळी सांगितले.”

 
 
 

“श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, रायगडचे प्रमुख सुनील पवार यांनी शिवरायांची आरमारविषयी दूरदृष्टी, मोगलांना तसेच समुद्री शत्रूंना नामोहरम करण्याच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, या प्रदर्शनाचे नेटके संयोजन केल्याबद्दल विनायक काळे तसेच नौदलाच्या अधिका-यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.”

 
 
 

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content