HomeArchiveमाणिक मुंडेलिखित `मीरा...

माणिक मुंडेलिखित `मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘हंस का दंश’चे प्रकाशन

Details
माणिक मुंडेलिखित `मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘हंस का दंश’चे प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मीराचे समर्पण हे विश्वातील विरळा उदाहरण – संत रमेशभाई ओझा यांचे विवेचन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मीरासारखे समर्पण कुणालाच शक्य नाही. तिने कन्हैय्याचा ध्यास सोडावा, यासाठी अनेक अघोरी प्रयत्न झाले. पण तिने कुणालाच दाद दिली नाही. इतकी ती समर्पित होती. पूर्ण विश्वात तिच्या भक्तीचा महिमा अगाध आहे, असे निरूपण संत रमेशभाई ओझा यांनी माणिक मुंडेलिखित ‘मीरा – भक्ती का अमिरस’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना केले.

कालजयी प्रकाशनतर्फे मुंबईच्या मुलुंड येथे ट्रान्सकॉन स्कायसिटी येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ‘मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘आणि हंस का दंश’ या ग्रंथांचे प्रकाशन महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी आणि संत श्री रमेशभाई ओझा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

हृदयाची स्पंदने ओळखली तर शब्दाची गरज नाही. भावतरंग पकडले आणि तादात्म झालो तर त्यापुढे शब्दही व्यर्थ ठरतात. बुद्ध आणि मीरा यांच्यात आपल्याला विरोधाभास दिसतो. कारण आपली दृष्टी विभाजित झालेली असते, असेही विवेचन यावेळी माणिक मुंडे यांनी केले.

 

मीराच्या जीवनात एक दर्द आहे. तिच्यात अनंताचा महासागर आहे. ब्रम्हस्वरूप मीरा त्यात डुंबली. तिच्या जीवन चरित्रातून प्रेमाची धारा वाहिली. हे सारे मीरा – भक्ती का अमिरस, हा ग्रंथ वाचताना पानोपानी जाणवते, असे महामंडेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी यावेळी म्हणाले. ‘हंस का दंश’ या ग्रंथाबाबत ते म्हणाले, हंसांचा दंश झाल्याचे कधी कुणाला दिसले नाही. दंश झाले त्यांनी कधी आपल्या वेदना प्रकट केल्या नाहीत. दंश झाल्यानंतरही आनंदरस देतात ते खरे संत.

यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिषकुमार चौहान म्हणाले की, संतपरंपरेने काय पाहिलं? त्यांना स्वत:चं भान नव्हतं. अनंतात ते लीन होतात. मीराबाई त्यातील एक. अनंत पाहण्याची खूप जणांची इच्छा असते. पण सर्वांनाच ते पाहण्यास मिळत नाही.

 

यावेळी आहारवेदाचे हरीश शेट्टी म्हणाले की, आहारवेदाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अभियानात शरीरासाठी आणि ज्ञानासाठी असे दोन उपक्रम चालवले जातात. आपण निसर्गासोबत राहिलो तर निसर्ग आपणास सांभाळेल.”
 
“मीराचे समर्पण हे विश्वातील विरळा उदाहरण – संत रमेशभाई ओझा यांचे विवेचन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मीरासारखे समर्पण कुणालाच शक्य नाही. तिने कन्हैय्याचा ध्यास सोडावा, यासाठी अनेक अघोरी प्रयत्न झाले. पण तिने कुणालाच दाद दिली नाही. इतकी ती समर्पित होती. पूर्ण विश्वात तिच्या भक्तीचा महिमा अगाध आहे, असे निरूपण संत रमेशभाई ओझा यांनी माणिक मुंडेलिखित ‘मीरा – भक्ती का अमिरस’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना केले.

कालजयी प्रकाशनतर्फे मुंबईच्या मुलुंड येथे ट्रान्सकॉन स्कायसिटी येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ‘मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘आणि हंस का दंश’ या ग्रंथांचे प्रकाशन महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी आणि संत श्री रमेशभाई ओझा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

हृदयाची स्पंदने ओळखली तर शब्दाची गरज नाही. भावतरंग पकडले आणि तादात्म झालो तर त्यापुढे शब्दही व्यर्थ ठरतात. बुद्ध आणि मीरा यांच्यात आपल्याला विरोधाभास दिसतो. कारण आपली दृष्टी विभाजित झालेली असते, असेही विवेचन यावेळी माणिक मुंडे यांनी केले.

 

मीराच्या जीवनात एक दर्द आहे. तिच्यात अनंताचा महासागर आहे. ब्रम्हस्वरूप मीरा त्यात डुंबली. तिच्या जीवन चरित्रातून प्रेमाची धारा वाहिली. हे सारे मीरा – भक्ती का अमिरस, हा ग्रंथ वाचताना पानोपानी जाणवते, असे महामंडेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी यावेळी म्हणाले. ‘हंस का दंश’ या ग्रंथाबाबत ते म्हणाले, हंसांचा दंश झाल्याचे कधी कुणाला दिसले नाही. दंश झाले त्यांनी कधी आपल्या वेदना प्रकट केल्या नाहीत. दंश झाल्यानंतरही आनंदरस देतात ते खरे संत.

यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिषकुमार चौहान म्हणाले की, संतपरंपरेने काय पाहिलं? त्यांना स्वत:चं भान नव्हतं. अनंतात ते लीन होतात. मीराबाई त्यातील एक. अनंत पाहण्याची खूप जणांची इच्छा असते. पण सर्वांनाच ते पाहण्यास मिळत नाही.

 

यावेळी आहारवेदाचे हरीश शेट्टी म्हणाले की, आहारवेदाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अभियानात शरीरासाठी आणि ज्ञानासाठी असे दोन उपक्रम चालवले जातात. आपण निसर्गासोबत राहिलो तर निसर्ग आपणास सांभाळेल.”
 
 

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content