HomeArchiveमहालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यातील...

महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यातील सर्व यंत्रणांचे चंद्रकांतदादांनी मानले आभार!

Details
महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यातील सर्व यंत्रणांचे चंद्रकांतदादांनी मानले आभार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारपासून वांगणी बदलापूर-वांगणी दरम्यान अडकलेली होती. त्यात तब्बल 1200 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी वेळीच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे व वांगणी येथील ग्रामस्थांचे राज्याचे महसूल मंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 1200 प्रवासी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण यंत्रणांना तत्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. या अडकलेल्या सर्व 1200 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यासाठी राज्याचे डिझास्टर मॅनेजमेंटची टीम, एनडीआरएफ, नेव्ही, रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी युद्धपातळीवर कार्य केले. नौसेना आणि एनडीआरएफ टीमप्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क करताच या यंत्रणांनी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावली. नेव्हीचे पाणबुडे अशी संपूर्ण यंत्रणा बचावकार्यात लागली होती.

 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत संपूर्ण संपूर्ण यंत्रणांना तत्काळ बचावकार्य करण्याचे आदेश दिले होते. एनडीआरएफच्या सहा बोटी सकाळी नऊ वाजल्यापासून बचाव कार्यात लागल्या होत्या. त्यांच्यासह स्थानिक पोलिस प्रशासन, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, हेसुध्दा बचावकार्यात घटनास्थळी हजर होते. त्यानंतर नेव्ही व एअर फोर्सलासुद्धा पाचारण करण्यात आले होते. एअरफोर्स दलातील हेलिकॉप्टरने नऊ जणांना ठाणे येथे सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले. सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सात लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अकरा वाजून पन्नास मिनिटांनी 117 लोकांना बाहेर काढण्यात आले. दुपारी एकच्या दरम्यान पाचशे लोकांची सुटका यामधून करण्यात आली. या रेल्वेमध्ये 1200 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी नऊ गर्भवती महिला होत्या. त्यांनाही वेळेत उपचार देऊन सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. याठिकाणी 37 डॉक्टरांची चमूही उपलब्ध करून देण्यात आला होता. ॲम्बुलन्स, औषध उपचार याचीही सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. 40 बसेस आणि टेम्पो याच्या साह्याने बदलापूर येथे प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात येत होते असेही पाटील यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारपासून वांगणी बदलापूर-वांगणी दरम्यान अडकलेली होती. त्यात तब्बल 1200 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी वेळीच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे व वांगणी येथील ग्रामस्थांचे राज्याचे महसूल मंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 1200 प्रवासी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण यंत्रणांना तत्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. या अडकलेल्या सर्व 1200 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यासाठी राज्याचे डिझास्टर मॅनेजमेंटची टीम, एनडीआरएफ, नेव्ही, रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी युद्धपातळीवर कार्य केले. नौसेना आणि एनडीआरएफ टीमप्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क करताच या यंत्रणांनी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावली. नेव्हीचे पाणबुडे अशी संपूर्ण यंत्रणा बचावकार्यात लागली होती.

 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत संपूर्ण संपूर्ण यंत्रणांना तत्काळ बचावकार्य करण्याचे आदेश दिले होते. एनडीआरएफच्या सहा बोटी सकाळी नऊ वाजल्यापासून बचाव कार्यात लागल्या होत्या. त्यांच्यासह स्थानिक पोलिस प्रशासन, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, हेसुध्दा बचावकार्यात घटनास्थळी हजर होते. त्यानंतर नेव्ही व एअर फोर्सलासुद्धा पाचारण करण्यात आले होते. एअरफोर्स दलातील हेलिकॉप्टरने नऊ जणांना ठाणे येथे सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले. सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सात लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अकरा वाजून पन्नास मिनिटांनी 117 लोकांना बाहेर काढण्यात आले. दुपारी एकच्या दरम्यान पाचशे लोकांची सुटका यामधून करण्यात आली. या रेल्वेमध्ये 1200 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी नऊ गर्भवती महिला होत्या. त्यांनाही वेळेत उपचार देऊन सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. याठिकाणी 37 डॉक्टरांची चमूही उपलब्ध करून देण्यात आला होता. ॲम्बुलन्स, औषध उपचार याचीही सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. 40 बसेस आणि टेम्पो याच्या साह्याने बदलापूर येथे प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात येत होते असेही पाटील यांनी सांगितले.”
 

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content