HomeArchive`मराठी’साठी कवी, लेखक,...

`मराठी’साठी कवी, लेखक, प्रकाशक एकवटले!

Details
“`मराठी’साठी कवी, लेखक, प्रकाशक एकवटले!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लहान मुलांची भाषा बघितली तर मराठी कशी टिकणार, ही काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. प्रकाशन व्यवसायात पन्नास टक्के घट झाली आहे. मराठीच्या दुरवस्थेविषयी सरकार गंभीर नाही. मराठी विषयाच्या सक्तीसाठी सरकारने कायदा करावा, म्हणून कायद्याचा मसुदा सरकारला दिला, तरी पुढे काही घडले नाही. राज्यात मराठी भाषा वाचवायची असेल तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, अशी जोरदार व एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली.

क्वचितच एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे दिसून आले. मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे धरण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात हा विचार पुढे आला.

लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी, मंगला गोडबोले, अश्विनी धोंगडे, नीलिमा गुंडी, संजय सोनवणी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, दीपक शिकारपूर, वि. दा. पिंगळे, डॉ. सतीश देसाई, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, रविमुकुल, बंडा जोशी, क्षितिज पाटुकले, अंजली कुलकर्णी, अरूण फडके, अनिल गोरे यांसह अनेक लेखक, कवी, प्रकाशक, शिक्षक बैठकीला उपस्थित होते.

शिक्षण विनोदाच्या तावडीत

मराठी नाटकाचा व सिनेमाचा प्रेक्षक तसेच वाचक कमी झाला आहे. या दशकात मराठीपुढे मोठे संकट ओढावले आहे. मराठी टिकवायची असेल तर मोठा संघर्ष केला पाहिजे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आंदोलन केले पाहिजे. तामिळनाडूसारखी भूमिका घेतली तरच मराठी टिकेल, असे भाष्यकार रामदास फुटाणे यांनी ठणकावले. मराठी भाषा आणि शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले आहे, अशी टपलीही त्यांनी मारली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लहान मुलांची भाषा बघितली तर मराठी कशी टिकणार, ही काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. प्रकाशन व्यवसायात पन्नास टक्के घट झाली आहे. मराठीच्या दुरवस्थेविषयी सरकार गंभीर नाही. मराठी विषयाच्या सक्तीसाठी सरकारने कायदा करावा, म्हणून कायद्याचा मसुदा सरकारला दिला, तरी पुढे काही घडले नाही. राज्यात मराठी भाषा वाचवायची असेल तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, अशी जोरदार व एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली.

क्वचितच एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे दिसून आले. मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे धरण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात हा विचार पुढे आला.

लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी, मंगला गोडबोले, अश्विनी धोंगडे, नीलिमा गुंडी, संजय सोनवणी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, दीपक शिकारपूर, वि. दा. पिंगळे, डॉ. सतीश देसाई, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, रविमुकुल, बंडा जोशी, क्षितिज पाटुकले, अंजली कुलकर्णी, अरूण फडके, अनिल गोरे यांसह अनेक लेखक, कवी, प्रकाशक, शिक्षक बैठकीला उपस्थित होते.

शिक्षण विनोदाच्या तावडीत

मराठी नाटकाचा व सिनेमाचा प्रेक्षक तसेच वाचक कमी झाला आहे. या दशकात मराठीपुढे मोठे संकट ओढावले आहे. मराठी टिकवायची असेल तर मोठा संघर्ष केला पाहिजे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आंदोलन केले पाहिजे. तामिळनाडूसारखी भूमिका घेतली तरच मराठी टिकेल, असे भाष्यकार रामदास फुटाणे यांनी ठणकावले. मराठी भाषा आणि शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले आहे, अशी टपलीही त्यांनी मारली.”

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content