HomeArchiveमंगल प्रभात लोढा...

मंगल प्रभात लोढा मुंबई भाजपचे अध्यक्ष!

Details
मंगल प्रभात लोढा मुंबई भाजपचे अध्यक्ष!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २५ वर्षांपासून आमदारपद भूषवत आहेत. राजकारणात स्वच्छ आणि मजबूत प्रतिमा असलेले मंगल प्रभात लोढा यांनी या नवीन जबाबदारीसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या संकल्पनेतून पक्षाला अधिक बळकट बनवून पुढे घेऊन जाण्याचे काम आपण करणार.

महाराष्ट्र विधानसभेचे पाचव्यांदा सदस्य असलेले लोढा १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये मुंबईच्या मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून विजयी होत आले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० हजार मताधिक्याने विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वधिक मतांनी विजय मिळविण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला होता. १८ डिसेंबर १९५५ रोजी जन्मलेले लोढा जोधपूर विद्यापीठातून बीकॉम, एलएलबी झाले. शिक्षण घेतल्यानंतर ते वकिलीचा पेशा करू लागले होते. विद्यार्थीदशेपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याशी जोडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले. विद्यार्थी जीवनात लोढ़ा जोधपूर विश्वविद्यालयाचे महासचिवदेखील होते.

 
त्यांचे वडील सुप्रसिद्ध न्यायमूर्ती गुमानमल लोढा यांनी तीन वेळा खासदारपद भूषवले असून राष्ट्रवादी विचारधारेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांना राष्ट्रवादाचे संस्कार त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आमदार लोढ़ा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासचिव आणि प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

लोढा यांनी १९८७ पासून एकूण ९ लोकसभा निवडणुकीत विविध पदांवरील मुख्य जबाबदारी पेलली असून एक यशस्वी रणानितीकार म्हणून त्यांची छबी निर्माण झालेली आहे. विद्यार्थीदशेत त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही सक्रिय भूमिका बजावली होती. ते १९८१ मुंबईला आले. कंस्ट्रक्शन व्यवसाय स्थापित करून त्यांनी हा व्यवसाय आपल्या मुलांकडे सोपवला असून ते आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असून समाजकार्य करत आहेत. ते म्हणाले की, देशाच्या सर्वात मोठ्या महानगराच्या अध्यक्षपदाची आपल्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती सर्वांच्या सहकार्याने पूर्णपणे पार पाडणार.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २५ वर्षांपासून आमदारपद भूषवत आहेत. राजकारणात स्वच्छ आणि मजबूत प्रतिमा असलेले मंगल प्रभात लोढा यांनी या नवीन जबाबदारीसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या संकल्पनेतून पक्षाला अधिक बळकट बनवून पुढे घेऊन जाण्याचे काम आपण करणार.

महाराष्ट्र विधानसभेचे पाचव्यांदा सदस्य असलेले लोढा १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये मुंबईच्या मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून विजयी होत आले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० हजार मताधिक्याने विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वधिक मतांनी विजय मिळविण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला होता. १८ डिसेंबर १९५५ रोजी जन्मलेले लोढा जोधपूर विद्यापीठातून बीकॉम, एलएलबी झाले. शिक्षण घेतल्यानंतर ते वकिलीचा पेशा करू लागले होते. विद्यार्थीदशेपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याशी जोडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले. विद्यार्थी जीवनात लोढ़ा जोधपूर विश्वविद्यालयाचे महासचिवदेखील होते.

 
त्यांचे वडील सुप्रसिद्ध न्यायमूर्ती गुमानमल लोढा यांनी तीन वेळा खासदारपद भूषवले असून राष्ट्रवादी विचारधारेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांना राष्ट्रवादाचे संस्कार त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आमदार लोढ़ा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासचिव आणि प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

लोढा यांनी १९८७ पासून एकूण ९ लोकसभा निवडणुकीत विविध पदांवरील मुख्य जबाबदारी पेलली असून एक यशस्वी रणानितीकार म्हणून त्यांची छबी निर्माण झालेली आहे. विद्यार्थीदशेत त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही सक्रिय भूमिका बजावली होती. ते १९८१ मुंबईला आले. कंस्ट्रक्शन व्यवसाय स्थापित करून त्यांनी हा व्यवसाय आपल्या मुलांकडे सोपवला असून ते आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असून समाजकार्य करत आहेत. ते म्हणाले की, देशाच्या सर्वात मोठ्या महानगराच्या अध्यक्षपदाची आपल्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती सर्वांच्या सहकार्याने पूर्णपणे पार पाडणार.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content