HomeArchiveपुढचे ४८ तास...

पुढचे ४८ तास महत्त्वाचे!

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतकेच सांगितले की, “राज्याला सरकार हवे आहे आणि सरकार लवकरात लवकर स्थापन होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.” मात्र या बोलण्यात कुठेही हे सरकार महायुतीचे असेल असे उद्गार त्यांनी काढले नाहीत, ही बाब महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळेच भाजपप्रणित नवे सरकार सध्यातरी, २०१४ प्रमाणे, शिवसेनेला वगळून भाजपासह अन्य मित्रपक्षांचे असण्याची शक्यता दिल्लीतील सूत्रांनी व्यक्त केली आहे.”
 

“दरम्यान, शिवसेनेसोबत स्थापन करायच्या संभाव्य संयुक्त राज्य सरकारसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोनिया गांधींची संमती घेतल्याचेही संकेत दिल्लीतून मिळत आहेत. सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर स्वतः शरदरावांनी असे सांगितले आहे की, अद्याप शिवसेनेकडून सरकार स्थापन करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आमच्यापुढे आलेला नाही. मात्र सोनिया गांधींबरोबर जी चर्चा झाली ती उद्या मुंबईत पक्षातली अन्य सहकाऱ्यांपुढे मांडणार आहे व त्यानंतर पुन्हा दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी येणार आहे असे ते म्हणाले.”
 
 
“दरम्यान, अमित शाह यांनी फडणवीस यांना असे स्पष्ट आदेश दिले आहेत की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद वा गृहमंत्रीपद वगळून काहीही देता येईल. मात्र तो तिढा तुम्ही तुमच्या स्तरावरच सोडवा. काही झाले तरी पुढच्या काही दिवसांतच सरकार स्थापन केले जाणे हेही अपिरहार्य मानले जात आहे. या त्यांच्या उद्गारांवरून पुन्हा एकदा विविध पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली शरद पवार घडवतील असे दिसते आहे. या नव्या पुलोदच्या प्रयोगात शिवसेनेची भूमिका मोठी असेल. त्यांच्याकडे सर्वाधिक आमदार असल्यामुळे मुख्यमंत्रीपद सेनेकडे सोपवले जाऊ शकते. मात्र सरकार स्थापनेसाठी अत्यावश्यक असणारा काँग्रेसचा पठिंबा शिवसेनेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्यामुळे त्या सरकारवर सेनेपेक्षा राष्ट्रवादीची छाप व सत्ता अधिक असू शकेल. त्या स्थितीत शिवसेनेकडे क्रमांक एकचे पद मात्र महत्त्वाची खात्यातील व एक वा दोन, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकतील असे अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत.”
 
 
तिकडे दिल्लीत फडणवीस यांनी नितीन गडकरींसह अन्य नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्या आटोपून मुख्यमंत्री रात्री उशिरा मुंबईत परतले. मंगळवारी ते पक्षातील त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. या बैठकीत भाजपाची पुढची रणनीती ठरेल असे सांगण्यात येते. या सर्व घडामोडींवरून पुढचे दोन दिवस म्हणजे कत्तलकी रात व दिन असणार आहेत.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content