HomeArchiveपालिकेकडून २० हजार...

पालिकेकडून २० हजार कोटी घेण्याची जनता दलाची मागणी

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा फुगा त्यानंतरचे पाच दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर पूर्णपणे फुटला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जनतेला थेट मदतीचा हात पुढे करीत, देशासमोर आदर्श निर्माण करावा, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाने केली आहे.”
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पाशात अडकलेल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी १२ मे रोजी २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर पुढचे पाच दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्याचा तपशील जाहीर करीत होत्या. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणानंतर जनतेच्या वा अर्थव्यवस्थेच्या हाती विशेष काही लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात २० लाख कोटी, २० लाख कोटी, असे दोनदोनदा उच्चारत जणू काही आपण जनतेसाठी अलीबाबाची गुहाच उघडीत आहोत, असा आविर्भाव नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला असला तरी हे केवळ पोकळ बुडबुडे आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.”
 
“मोदी यांनी २० लाख कोटी रूपयांचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ही रक्कम फार-फार तर दोन लाख कोटी रूपयांच्या आसपास असणार आहे. त्यातीलही साधारण दीड लाख कोटी रूपये हे जगभर पेट्रोल, डिझेलचे भाव कोसळत असताना भारत सरकारने या दोन्ही गोष्टींच्या किमतीत लिटरमागे केलेल्या अनुक्रमे १० रूपये आणि १३ रूपयांच्या दरवाढीतून मिळणार आहे. त्यामुळे या आर्थिक पॅकेजमध्ये ना अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे, ना अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळून भूकेकंगाल झालेल्या कष्टकऱ्यांच्या खिशात दमडी पडणार आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, प्रधान महासचिव प्रताप होगाडे, पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर, युवा अध्यक्ष नाथा शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, महासचिव अझमल खान यांनी केली आहे.”

“या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील कष्टकरी जनतेवर ओढवलेले संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने स्वतः पुढाकार घेऊन तळाच्या दोन कोटी कुटुंबांना (अंदाजे १० कोटी जनता) प्रत्येकी साधारण दहा हजार रूपयांची थेट मदत एक वा दोन टप्प्यात देऊन देशासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन या नेत्यांनी केले आहे.”
 
“””दुष्काळ वा अन्य कारणाने जेव्हा शेतकरी अडचणीत असेल तेव्हा त्याला स्वराज्याकडून मदत द्यावी””, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात म्हटले आहे. तोच आदर्श बाळगून राज्य सरकारने अडचणीत असलेल्या गरीब आणि गरजू जनतेला थेट मदत द्यावी. यासाठी लागणारा २० हजार कोटी रूपयांचा निधी कसा उभा करायचा, हा प्रश्न असेल तर मुंबई महापालिकेकडून राज्य सरकार कर्जाऊ ही रक्कम घेऊ शकेल. महापालिकेकडे जवळपास ८० हजार कोटी रूपयांच्या आज ठेवी आहेत. जनतेने दिलेल्या करातून ही गंगाजळी उभी राहिली आहे. त्यामुळे जनतेच्या अडचणीच्या वेळी ती वापरणे योग्यच ठरेल. कमी व्याजदराने राज्य सरकारला हा पैसा मिळू शकेल.”

“यातून मुंबईतील सुमारे २० लाख कुटुंबाना (एक कोटी लोक) तर उर्वरित राज्यातील सुमारे एक कोटी, ८० लाख कुटुंबाना (नऊ कोटी जनता) प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदत दिल्यास पुढचे किमान दोन-तीन महिने लोक स्थिरस्थावर राहू शकतील. आज उपासमारीच्या भीतीने लोक शहरांतून गावाकडे स्थलांतरित होत असून त्यातून कारोनाच्या प्रसाराचा धोका वाढत आहे, त्यालाही यामुळे आळा बसू शकेल.”

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content