HomeArchiveदारूची दुकाने पुन्हा...

दारूची दुकाने पुन्हा बंद होणार?

Details
 
 
किरण हेगडे
Kiranhegde17@gmail.com

“आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये अगदी रेड झोनसह सर्व भागात दारूची दुकाने व कारखाने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी त्यासाठी असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास किंवा यातून हफ्तेखोरीला ऊत आल्यास दारूची दुकाने बंद केल्यावाचून दुकानदारांसमोर पर्याय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया दारू विक्रेत्यांकडून मिळत आहे.”
 
“राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी जारी केलेल्या सीलबंद मद्दय विक्री करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये इतक्या जाचक अटी घातल्या आहेत की त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास किंवा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यासच दारूची दुकाने सुरू राहू शकतात. मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव महापालिका क्षेत्र वगळून दारूचे कारखाने सुरू होऊ शकतात. मात्र, यावेळी सर्व कामगारांची थर्मल चाचणी आवश्यक आहे. त्यापैकी कोणाला सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असता कामा नयेत. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक अंतर कायम राखले पाहिजे.”
 
“दारूच्या घाऊक विक्रेत्यांनी सर्व झोनमध्ये आपली दुकाने चालू करण्यास हरकत नाही. मात्र, यातून रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळला जाईल. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ही दुकाने बंद राहतील. त्यांना ५० टक्के कर्मचारी ठेवण्याची मुभा आहे. सर्व नोकरांची तसेच कामगारांची थर्मल स्क्रिनिंग आवश्यक करण्यात आली आहे. त्यांनाही कोणाला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यास कामावर ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.”
 
“किरकोळ दारू विक्रेत्यांच्या अटी तर भलत्याच आहेत. त्यांनी फक्त सीलबंद दारूची बाटलीच विकावी. मॉल, बाजार संकुल तसेच बाजारातील दुकाने चालू करता येणार नाहीत. ती एकल असावीत. निवासी वस्तीत असावीत. दुकानासमोर एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक हजर असता कामा नयेत. दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर असावे. त्यासाठी तशी वर्तुळे आखावीत. दुकानदाराने आपल्या नोकरांची तसेच ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंग करावी. ज्या ग्राहकांना सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये. दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावा. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी हँड सॅनिटायझरची सोय करावी. हे सर्व करण्यासाठी लागणारा नोकरवर्ग दुकानदाराने नेमावा. सकाळी १० ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याला दुकान उघडे ठेवता येईल. मद्द्य बाळगणे व खरेदी करणे याच्या कायद्याचे उल्ल्घन होणार नाही, याची काळजी त्याने घ्यावी. तेथे कोणीही दारू पिणार नाही याची काळजी घ्यावी. यामध्ये कोठेही कसूर आढळल्यास दुकान तत्काळ बंद केले जाईल.”
 
 
 
“प्रत्येक दुकानदाराने दुकानाबाहेर सहज दिसेल असा फलक लावावा. त्यावर, दुकानाच्या सुधारीत वेळा, एकावेळी पाचपेक्षा जास्त लोक असू नये, सामाजिक अंतर पाळले जावे, मास्क अनिवार्य आहे. प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. ज्याला सर्दी, ताप, खोकला असेल त्याने दुकानात प्रवेश करू नये, दुकानात दारू पिता येणार नाही, परिसरात थुंकण्यास मनाई असेल, असा मजकूर लिहिलेला असावा. दुकानदारास गरज भासल्यास पोलीस उपलब्ध होतील, असे उत्पादन शुल्क खात्याने कळवले आहे. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांची काटोकोर अंमलबजावणी होणे गरजे असल्याचे म्हटले आहे.”
 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content