HomeArchiveगोपाळ शेट्टी यांची...

गोपाळ शेट्टी यांची उद्या उत्तर मुंबईत पदयात्रा!

Details
गोपाळ शेट्टी यांची उद्या उत्तर मुंबईत पदयात्रा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापल्या मतदारसंघात 150 किमी पदयात्रा करून जनजागृती करण्याचे देशातील सर्व खासदारांना सांगितले आहे. ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशभर भ्रमण करून गोरगरिबांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्याप्रमाणे देशातील खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासाच्या संधी व जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत जाऊन ते समजून घ्यावेत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना केले आहे.

पंतप्रधानांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी कंबर कसली आहे. उद्याच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ते बोरिवली पश्चिम येथून सकाळी 7.30 वाजता पदयात्रेला प्रारंभ करणार आहेत. उत्तर मुंबईतील जनतेने 4,65,248 इतक्या भरघोस मतांनी निवडून देऊन त्यांच्यावर जो जबरदस्त विश्वास दाखवला त्याची जाणीव असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या संदेशाला प्रमाण मानून येत्या 15 दिवसांत उत्तर मुंबईत 150 किमी पदयात्रा ते काढणार आहेत. या मतदारसंघातील दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघातील 42 वॉर्डमध्ये अंतिम व्यक्तीपर्यंत जाऊन जनतेच्या समस्या समजून घेणार आहेत. तसेच खासदार म्हणून 5 वर्षांचा कालबध्द कार्यक्रम आखून उत्तर मुंबईतील जास्तीतजास्त समस्यांचा निपटारा करेन असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

उद्या दि,15 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता बोरिवली पश्चिम स्वामी विवेकानंद पुतळ्यापासून या पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते पोयसर जिमखाना, चिकूवाडी, जॉगर्स पार्क ते वीर सावरकर उद्यान मार्गे लोकमान्य टिळक चौक येथे या पदयात्रेची समाप्ती होईल. या पदयात्रेत खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमवेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, नगरसेवक प्रवीण शाह, विद्यार्थी सिंह, नगरसेविका बीना दोशी, आसावरी पाटील, अंजली रेडकर, भाजपा बोरिवली अध्यक्ष दीपक पाटणेकर, माजी महापौर मोहन मिठबावकर, भाजपाचे कार्यकर्ते, बोरीवलीतील विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापल्या मतदारसंघात 150 किमी पदयात्रा करून जनजागृती करण्याचे देशातील सर्व खासदारांना सांगितले आहे. ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशभर भ्रमण करून गोरगरिबांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्याप्रमाणे देशातील खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासाच्या संधी व जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत जाऊन ते समजून घ्यावेत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना केले आहे.

पंतप्रधानांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी कंबर कसली आहे. उद्याच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ते बोरिवली पश्चिम येथून सकाळी 7.30 वाजता पदयात्रेला प्रारंभ करणार आहेत. उत्तर मुंबईतील जनतेने 4,65,248 इतक्या भरघोस मतांनी निवडून देऊन त्यांच्यावर जो जबरदस्त विश्वास दाखवला त्याची जाणीव असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या संदेशाला प्रमाण मानून येत्या 15 दिवसांत उत्तर मुंबईत 150 किमी पदयात्रा ते काढणार आहेत. या मतदारसंघातील दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघातील 42 वॉर्डमध्ये अंतिम व्यक्तीपर्यंत जाऊन जनतेच्या समस्या समजून घेणार आहेत. तसेच खासदार म्हणून 5 वर्षांचा कालबध्द कार्यक्रम आखून उत्तर मुंबईतील जास्तीतजास्त समस्यांचा निपटारा करेन असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

उद्या दि,15 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता बोरिवली पश्चिम स्वामी विवेकानंद पुतळ्यापासून या पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते पोयसर जिमखाना, चिकूवाडी, जॉगर्स पार्क ते वीर सावरकर उद्यान मार्गे लोकमान्य टिळक चौक येथे या पदयात्रेची समाप्ती होईल. या पदयात्रेत खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमवेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, नगरसेवक प्रवीण शाह, विद्यार्थी सिंह, नगरसेविका बीना दोशी, आसावरी पाटील, अंजली रेडकर, भाजपा बोरिवली अध्यक्ष दीपक पाटणेकर, माजी महापौर मोहन मिठबावकर, भाजपाचे कार्यकर्ते, बोरीवलीतील विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहेत.”

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content