HomeArchive'क्रांती चिरायु होवो'चे...

‘क्रांती चिरायु होवो’चे 15 ऑगस्टला प्रकाशन!

Details
‘क्रांती चिरायु होवो’चे 15 ऑगस्टला प्रकाशन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भरारी प्रकाशनच्या लता गुठेनिर्मित व ज्येष्ठ लेखिका स्मिता भागवत यांनी लिहिलेलं ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्टला होणार आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उद्द्येश हाच आहे की आजच्या आणि उद्याच्या पिढीला देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांचं कार्य पोहोचावं आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांची आठवण कायम मनात जपून ठेवावी. पुस्तक प्रकाशित करून तुमच्या हातात ते देण्याचं माझं काम मी करत आहे. पण, तुमचं काम आहे, ते शाळा-कॉलेजपर्यंत, वाचनालयपर्यंत हेही पुस्तक पोहोचावे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने भेट म्हणून ही पुस्तकं देण्यात यावीत. काही प्रमाणात का होईना आपलं कर्तव्य आपण पार पाडुया.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करून आपण घरी येतो. या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला मिळाल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या क्रांतिकारकाचा किती त्याग त्यामागे आहे हे आठवले तरी अंगावर शहारे येतात. अशा या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यासाठी मी घेतलेले हे व्रत. प्रत्येक 15 ऑगस्टला क्रांतिवीरावर एक पुस्तक प्रकाशित करायचे हा नियम आहे. पहिल्या वर्षी ‘सावरकरांची पत्रकारिता’ हा विषय निवडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मॅडम कामा’ यांच्यावर पुस्तक काढलं आणि यावर्षी हे अप्रतिम पुस्तक, मला प्रकाशित करायला मिळत आहे याचा मनोमन आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भरारी प्रकाशनच्या लता गुठेनिर्मित व ज्येष्ठ लेखिका स्मिता भागवत यांनी लिहिलेलं ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्टला होणार आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उद्द्येश हाच आहे की आजच्या आणि उद्याच्या पिढीला देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांचं कार्य पोहोचावं आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांची आठवण कायम मनात जपून ठेवावी. पुस्तक प्रकाशित करून तुमच्या हातात ते देण्याचं माझं काम मी करत आहे. पण, तुमचं काम आहे, ते शाळा-कॉलेजपर्यंत, वाचनालयपर्यंत हेही पुस्तक पोहोचावे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने भेट म्हणून ही पुस्तकं देण्यात यावीत. काही प्रमाणात का होईना आपलं कर्तव्य आपण पार पाडुया.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करून आपण घरी येतो. या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला मिळाल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या क्रांतिकारकाचा किती त्याग त्यामागे आहे हे आठवले तरी अंगावर शहारे येतात. अशा या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यासाठी मी घेतलेले हे व्रत. प्रत्येक 15 ऑगस्टला क्रांतिवीरावर एक पुस्तक प्रकाशित करायचे हा नियम आहे. पहिल्या वर्षी ‘सावरकरांची पत्रकारिता’ हा विषय निवडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मॅडम कामा’ यांच्यावर पुस्तक काढलं आणि यावर्षी हे अप्रतिम पुस्तक, मला प्रकाशित करायला मिळत आहे याचा मनोमन आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.”

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content