HomeArchiveकोकणातील पर्यटनासाठी १०...

कोकणातील पर्यटनासाठी १० वर्षांचा परवाना द्या – निरंजन डावखरे

Details
कोकणातील पर्यटनासाठी १० वर्षांचा परवाना द्या – निरंजन डावखरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना परवाना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून दहा वर्षांसाठी परवाने देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी नुकतीच विधान परिषदेत दिली. कोकणातील पर्यटन विकासाच्या आराखड्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी मान्य करण्यात आली.

कोकणातील साहसी क्रीडा प्रकारांसंदर्भातील धोरण, पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आमदार डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सुचनेद्वारे मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना सुरक्षेअभावी एका १५ वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर मंत्री येरावार यांनी उत्तर दिले.

पर्यटनाला वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण साहसी खेळांबाबत तरूणांना प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्याला जावे लागते. या व्यवसायासाठी केवळ एक वर्षाचा परवाना दिला जातो. त्यामुळे दर ११ महिन्यांनी नूतनीकरणासाठी धाव घ्यावी लागते. त्याचबरोबर वर्षभराच्या परवानगीमुळे बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जात नाही. या पार्श्वभूमीवर दहा वर्षांसाठी परवाने द्यावेत, अशी आग्रही मागणी डावखरे यांनी केली. पर्यटनाबाबत वेगवेगळ्या यंत्रणांकडून परवानगी दिली जाते. या पार्श्वभूमीवर परवाने देण्यासाठी एकच यंत्रणा उभारण्याचाही आग्रहही त्यांनी केला. त्यावर मंत्रीमहोदयांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.

 

पर्यटक सुरक्षेसाठी एक कोटी ६६ लाखांचा निधी

रायगड जिल्ह्यातील मांडवा, अलिबाग, आक्षी, नागाव, मुरूड-एकदरा, मुरूड जंजिरा जलदूर्ग, काशीद बीच, श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर, दिवेआगार व किहिंम किनाऱ्यावर पर्यटकांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी ७८ लाख ६ हजार १००, रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, भाट्ये, मुरूड, कर्दे, वेळणेश्वर, गुहागर, हर्णे, दाभोळ, मुसाकाजी किनाऱ्यावर सुरक्षेसाठी तीन लाख ५९ हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर, तारकर्ली, कुणकेश्वर, मालवण, देवगडसाठी ४३ लाख ८५ हजार ९५० रुपये, पालघर जिल्ह्यातील मांडवा, एडवण, केळवा, माहिम, शिरगाव, सातपाटी, बोर्डी, घोलवड, चिंचणी, झाई-बोरीगाव, डहाणू, राजोडी, सुरूची बाग किनाऱ्यासाठी ४१ लाख ६ हजार ५० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर किनाऱ्यावर प्रत्येकी २५ जीवरक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देण्यात आला आहे, असेही येरावार यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना परवाना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून दहा वर्षांसाठी परवाने देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी नुकतीच विधान परिषदेत दिली. कोकणातील पर्यटन विकासाच्या आराखड्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी मान्य करण्यात आली.

कोकणातील साहसी क्रीडा प्रकारांसंदर्भातील धोरण, पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आमदार डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सुचनेद्वारे मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना सुरक्षेअभावी एका १५ वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर मंत्री येरावार यांनी उत्तर दिले.

पर्यटनाला वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण साहसी खेळांबाबत तरूणांना प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्याला जावे लागते. या व्यवसायासाठी केवळ एक वर्षाचा परवाना दिला जातो. त्यामुळे दर ११ महिन्यांनी नूतनीकरणासाठी धाव घ्यावी लागते. त्याचबरोबर वर्षभराच्या परवानगीमुळे बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जात नाही. या पार्श्वभूमीवर दहा वर्षांसाठी परवाने द्यावेत, अशी आग्रही मागणी डावखरे यांनी केली. पर्यटनाबाबत वेगवेगळ्या यंत्रणांकडून परवानगी दिली जाते. या पार्श्वभूमीवर परवाने देण्यासाठी एकच यंत्रणा उभारण्याचाही आग्रहही त्यांनी केला. त्यावर मंत्रीमहोदयांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.

 

पर्यटक सुरक्षेसाठी एक कोटी ६६ लाखांचा निधी

रायगड जिल्ह्यातील मांडवा, अलिबाग, आक्षी, नागाव, मुरूड-एकदरा, मुरूड जंजिरा जलदूर्ग, काशीद बीच, श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर, दिवेआगार व किहिंम किनाऱ्यावर पर्यटकांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी ७८ लाख ६ हजार १००, रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, भाट्ये, मुरूड, कर्दे, वेळणेश्वर, गुहागर, हर्णे, दाभोळ, मुसाकाजी किनाऱ्यावर सुरक्षेसाठी तीन लाख ५९ हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर, तारकर्ली, कुणकेश्वर, मालवण, देवगडसाठी ४३ लाख ८५ हजार ९५० रुपये, पालघर जिल्ह्यातील मांडवा, एडवण, केळवा, माहिम, शिरगाव, सातपाटी, बोर्डी, घोलवड, चिंचणी, झाई-बोरीगाव, डहाणू, राजोडी, सुरूची बाग किनाऱ्यासाठी ४१ लाख ६ हजार ५० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर किनाऱ्यावर प्रत्येकी २५ जीवरक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देण्यात आला आहे, असेही येरावार यांनी सांगितले.”
 

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content