HomeArchiveकृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात...

कृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी!

Details
कृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी!

    26-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पाठपुरावा केला होता.
 
 
राज्यात बारावीच्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. या प्रश्नासंदर्भात आमदार डावखरे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर कृषी व पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले होते. तसेच फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली होती. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह डावखरे यांनी धरला. यासंदर्भात प्रधान सचिव डवले यांच्याबरोबरच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, शिक्षण संचालक कौसडीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.
 
 
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने काल राज्यातील चार कृषी विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथील कृषी महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची यादी आज, गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशअर्ज दाखल करता येतील. ४ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या प्रवेशअर्जांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून प्रवेश फेरीला सुरूवात होईल. संस्थास्तरीय कोट्यातील रिक्त जागा संबंधित महाविद्यालयस्तरावर भरण्यासाठी ११ ऑक्टोबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पाठपुरावा केला होता.
 
 
“राज्यात बारावीच्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. या प्रश्नासंदर्भात आमदार डावखरे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर कृषी व पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले होते. तसेच फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली होती. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह डावखरे यांनी धरला. यासंदर्भात प्रधान सचिव डवले यांच्याबरोबरच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, शिक्षण संचालक कौसडीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.”
 
 
“महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने काल राज्यातील चार कृषी विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथील कृषी महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची यादी आज, गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशअर्ज दाखल करता येतील. ४ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या प्रवेशअर्जांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून प्रवेश फेरीला सुरूवात होईल. संस्थास्तरीय कोट्यातील रिक्त जागा संबंधित महाविद्यालयस्तरावर भरण्यासाठी ११ ऑक्टोबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.”

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदकृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशभाजपआमदार निरंजन वसंत डावखरेकृषी व पशुसंवर्धन विभागफेरपरीक्षा

Continue reading

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...
Skip to content