HomeArchiveकांदिवली वाहतूक विभाग...

कांदिवली वाहतूक विभाग राबविणार धडक मोहीम – अतुल भातखळकर

Details
कांदिवली वाहतूक विभाग राबविणार धडक मोहीम – अतुल भातखळकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कांदिवलीमधील अनधिकृत वाहने, बेकायदा पार्किंग आदी वाहतूक समस्येसंदर्भात बुधवारी कांदिवली पूर्व, समता नगर, एसीपी कार्यालय येथे संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. या समस्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी येत्या आठवड्यात वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन धडक मोहीम राबविणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

 
कांदिवली पूर्व विभागातील वाहतूक समस्यांच्या संदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी नुकतीच डीसीपी, डीसीपी वाहतूक, परिवहन तसेच महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पोलिस प्रशासनातर्फे येत्या आठवड्यात अवैध वाहनांवर कडक कारवाई केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांवरील सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात येतील असे आश्वासन पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. आकुर्ली रोड वरील वाहतुकीला आळा बसावा यासाठी पोलीस बंदोबस्त, कांदिवली आणि मालाड पूर्व रेल्वेस्टेशन परिसरात सकाळच्या वेळी पोलीस बंदोबस्त, अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंग थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश भातखळकर यांनी या बैठकीमध्ये दिले.
 
या सगळ्या मागण्या पोलीस, मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक प्रशासनाने मान्य केल्या आहेत. या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन डीसीपी स्वामी यांनी दिले आहे. त्याचबरोबर वर्दळीच्या ठिकाणी पे अँण्ड पार्किंग जागा, रॅश ड्रायव्हिंग, डबल पार्किंग आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थित असलेल्या दक्ष नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीला कांदिवली डीसीपी डॉ. डी. स्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी कसबे, आर दक्षिण विभाग मुंबई मनपाचे अधिकारी आकरे, कांदिवली वाहतूक विभागाचे डीसीपी संदीप भाजीभाकरे, डेप्युटी आरटीओ दहिसर विभाग अशोक पवार, नगरसेविका सुरेखा पाटील, नगरसेवक ठाकूर सागर-सिंह, ‘लोखंडवाला रेसिडेंट्स असो.’ आणि दक्ष नागरिक उपस्थित यावेळी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कांदिवलीमधील अनधिकृत वाहने, बेकायदा पार्किंग आदी वाहतूक समस्येसंदर्भात बुधवारी कांदिवली पूर्व, समता नगर, एसीपी कार्यालय येथे संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. या समस्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी येत्या आठवड्यात वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन धडक मोहीम राबविणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

 
कांदिवली पूर्व विभागातील वाहतूक समस्यांच्या संदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी नुकतीच डीसीपी, डीसीपी वाहतूक, परिवहन तसेच महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पोलिस प्रशासनातर्फे येत्या आठवड्यात अवैध वाहनांवर कडक कारवाई केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांवरील सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात येतील असे आश्वासन पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. आकुर्ली रोड वरील वाहतुकीला आळा बसावा यासाठी पोलीस बंदोबस्त, कांदिवली आणि मालाड पूर्व रेल्वेस्टेशन परिसरात सकाळच्या वेळी पोलीस बंदोबस्त, अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंग थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश भातखळकर यांनी या बैठकीमध्ये दिले.
 
या सगळ्या मागण्या पोलीस, मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक प्रशासनाने मान्य केल्या आहेत. या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन डीसीपी स्वामी यांनी दिले आहे. त्याचबरोबर वर्दळीच्या ठिकाणी पे अँण्ड पार्किंग जागा, रॅश ड्रायव्हिंग, डबल पार्किंग आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थित असलेल्या दक्ष नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीला कांदिवली डीसीपी डॉ. डी. स्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी कसबे, आर दक्षिण विभाग मुंबई मनपाचे अधिकारी आकरे, कांदिवली वाहतूक विभागाचे डीसीपी संदीप भाजीभाकरे, डेप्युटी आरटीओ दहिसर विभाग अशोक पवार, नगरसेविका सुरेखा पाटील, नगरसेवक ठाकूर सागर-सिंह, ‘लोखंडवाला रेसिडेंट्स असो.’ आणि दक्ष नागरिक उपस्थित यावेळी उपस्थित होते.”
 
 

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content