HomeArchiveकांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या...

कांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीवर प्रभावी मात्रा!

Details
कांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीवर प्रभावी मात्रा!

    18-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईच्या कांदिवली (पूर्व) आकुर्ली रोडच्या अरूंद भुयारी मार्गामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येचा येत्या काही दिवसात उतारा होणार आहे. कांदिवली पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाची वर्कऑर्डर जारी करण्यात आली असून आठवड्याभरात काम सुरू होईल. या कामाचे भूमीपूजन नुकतेच खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
 
आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीच्या समस्येचा कांदिवली पूर्वमधील लोकांना अनेक वर्ष त्रास होत आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी ही समस्या सोडवण्याच्या दिशेने गेली पाच वर्षे जोरदार प्रयत्न केले. एकीकडे त्यांनी महिंद्रा कंपनीपासून समतानगरपर्यंत जाणाऱ्या पर्यायी डीपी रोडचा मार्ग निर्वेध केला असताना आकुर्ली भुयारी मार्गाची समस्यासुद्धा निर्णायकरित्या सोडवली. त्यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
हा भुयारी मार्ग १६ फुटांचा असून याची रूंदी ३३.१० फूट म्हणजे दुप्पटीपेक्षा जास्त होणार आहे. रूंदीकरणासाठी २६ कोटी ८३ लाख रूपये खर्च करण्यात येणार असून काम ३ वर्षांत पूर्ण होईल. हा अरूंद भुयारी मार्ग वाहतूककोंडीचे महत्त्वाचे कारण बनला होता. या कामासाठी मेट्रो ऑथेरिटीची परवानगी मिळाली आहे. मतदारांना दिलेले एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करू शकलो याचे मला समाधान आहे, असे भातखळकर म्हणाले.
 

 
 
 
आमदार भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यांच्यामध्ये या समस्या सोडवण्यासाठी लागणारी धमकही पुरेपूर आहे, या शब्दांत खासदार गोपाळ शेट्टी यांनी भातखळकर यांचे कौतुक केले. भूमीपूजनाला कांदिवली पूर्वतील नागरीकांनी भर पावसात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
 

 
 

 
 
 ”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
मुंबईच्या कांदिवली (पूर्व) आकुर्ली रोडच्या अरूंद भुयारी मार्गामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येचा येत्या काही दिवसात उतारा होणार आहे. कांदिवली पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाची वर्कऑर्डर जारी करण्यात आली असून आठवड्याभरात काम सुरू होईल. या कामाचे भूमीपूजन नुकतेच खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
 

आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीच्या समस्येचा कांदिवली पूर्वमधील लोकांना अनेक वर्ष त्रास होत आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी ही समस्या सोडवण्याच्या दिशेने गेली पाच वर्षे जोरदार प्रयत्न केले. एकीकडे त्यांनी महिंद्रा कंपनीपासून समतानगरपर्यंत जाणाऱ्या पर्यायी डीपी रोडचा मार्ग निर्वेध केला असताना आकुर्ली भुयारी मार्गाची समस्यासुद्धा निर्णायकरित्या सोडवली. त्यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
“हा भुयारी मार्ग १६ फुटांचा असून याची रूंदी ३३.१० फूट म्हणजे दुप्पटीपेक्षा जास्त होणार आहे. रूंदीकरणासाठी २६ कोटी ८३ लाख रूपये खर्च करण्यात येणार असून काम ३ वर्षांत पूर्ण होईल. हा अरूंद भुयारी मार्ग वाहतूककोंडीचे महत्त्वाचे कारण बनला होता. या कामासाठी मेट्रो ऑथेरिटीची परवानगी मिळाली आहे. मतदारांना दिलेले एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करू शकलो याचे मला समाधान आहे, असे भातखळकर म्हणाले.”
 

 
 
 
“आमदार भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यांच्यामध्ये या समस्या सोडवण्यासाठी लागणारी धमकही पुरेपूर आहे, या शब्दांत खासदार गोपाळ शेट्टी यांनी भातखळकर यांचे कौतुक केले. भूमीपूजनाला कांदिवली पूर्वतील नागरीकांनी भर पावसात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.”
 

 
 

 
 
 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content