HomeArchiveअसा रंगला श्रावण...

असा रंगला श्रावण संध्येचा सोहळा!

Details
असा रंगला श्रावण संध्येचा सोहळा!

    28-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबई – मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आणि भरारी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय गावस्कर हॉल येथे श्रावणसंध्येच्या कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन व निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन मोठ्या थाटात पार पडले.
 
 
कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली, मान्यवरांच्या हस्ते लता गुठे लिखित ‘संत चैतन्याचा मेळा’, स्मिता भागवत लिखित ‘क्रांती चिरायू होवो’ व राजेंद्र पाटील लिखित ‘आठवण’ कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे यांनी ‘संत चैतन्याचा मेळा’ या पुस्तकावर सुंदर विवेचन केले. आजच्या आणि उद्याच्या पिढीला हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले. मानवी जीवनात अध्यात्माचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व काय आहे, हे त्यांनी विश्लेषणपूर्वक सांगितले.
 
 
लेखक, प्राध्यापक अविनाश कोल्हे यांनी त्यांच्या मनोगतात ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले त्यांची आठवण सदैव स्मरणात राहवी, म्हणून अशा पुस्तकाची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम भरारी प्रकाशनच्या लता गुठे करत आहेत, असेही ते म्हणाले.
 
 
आपल्या अध्यक्षीय भाषणात नमिता कीर म्हणाल्या की, अभ्यासाला पूरक आणि समाजाला प्रेरणा व प्रोत्साहन देणारी पुस्तकं वैचारिक बदल घडवितात. संत चैतन्याचा मळा, या पुस्तकात १४ संतांचा समावेश केलेला आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास लता गुठे यांनी केलेला दिसतो. अशी पुस्तकं लिहिण्यासाठी अध्यात्म समजून घेऊन ते आत मुरवावे लागते तेव्हाच अशी पुस्तकं एखादी व्यक्ती लिहू शकते. प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टला क्रांतीवीरांवर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा वसा लता गुठे यांनी घेतला आहे आणि तो अतिशय स्तुत्य आहे.
 
 
स्मिता भागवत यांनी, क्रांती चिरायू होवो, हे पुस्तक अतिशय ओघवत्या शैलीत लिहिले आहे, असे सांगितले. चंद्रशेखर आझाद, दुर्गा देवी होरा, भगवती होरा यांचे क्रांती लढ्यातील कार्य संक्षिप्त रूपात परंतु वेध घेणारे आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक क्रांतिकारकाचा उल्लेखही या पुस्तकात वाचायला मिळतो आणि त्यांच्या कार्याची तीव्रता आपल्या मनाला भेदून जाते. संत चैतन्याचा मेळा आणि क्रांती चिरायू होवो हे दोन्ही पुस्तकं संग्रही ठेवण्यायोग्य व उद्याच्या पिढीसाठी फार महत्त्वाची आहेत.
 
 
श्रावणसंध्या काव्यसंमेलनातील निमंत्रित कवी/कवयित्री यांनी सादर केलेल्या निसर्ग कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. गौरी कुलकर्णी, अनुराधा नेरूरकर, कविता राजपूत, शांताराम लोखंडे, प्रशांत राऊत, सूर्यकांत मालुसरे, रेणुका पाटील व इतर कवींनी कविता सादर केल्या. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये गुरूनाथ तेंडुलकर, भूपेश मिस्त्री, संजय भिडे, शिवाजी गावडे, अशोक शिंदे, मंदाकिनी भट, शैलेश शेट्ये व इतर मान्यवर उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा नाईक व लता गुठे यांनी केले.
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

खर्नीचा राजा रवाना..
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/News-On-Ganpati-Photos.html
 ”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 

मुंबई – मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आणि भरारी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय गावस्कर हॉल येथे श्रावणसंध्येच्या कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन व निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन मोठ्या थाटात पार पडले.
 
 

“कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली, मान्यवरांच्या हस्ते लता गुठे लिखित ‘संत चैतन्याचा मेळा’, स्मिता भागवत लिखित ‘क्रांती चिरायू होवो’ व राजेंद्र पाटील लिखित ‘आठवण’ कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे यांनी ‘संत चैतन्याचा मेळा’ या पुस्तकावर सुंदर विवेचन केले. आजच्या आणि उद्याच्या पिढीला हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले. मानवी जीवनात अध्यात्माचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व काय आहे, हे त्यांनी विश्लेषणपूर्वक सांगितले.”
 
 

“लेखक, प्राध्यापक अविनाश कोल्हे यांनी त्यांच्या मनोगतात ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले त्यांची आठवण सदैव स्मरणात राहवी, म्हणून अशा पुस्तकाची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम भरारी प्रकाशनच्या लता गुठे करत आहेत, असेही ते म्हणाले.”
 
 

“आपल्या अध्यक्षीय भाषणात नमिता कीर म्हणाल्या की, अभ्यासाला पूरक आणि समाजाला प्रेरणा व प्रोत्साहन देणारी पुस्तकं वैचारिक बदल घडवितात. संत चैतन्याचा मळा, या पुस्तकात १४ संतांचा समावेश केलेला आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास लता गुठे यांनी केलेला दिसतो. अशी पुस्तकं लिहिण्यासाठी अध्यात्म समजून घेऊन ते आत मुरवावे लागते तेव्हाच अशी पुस्तकं एखादी व्यक्ती लिहू शकते. प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टला क्रांतीवीरांवर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा वसा लता गुठे यांनी घेतला आहे आणि तो अतिशय स्तुत्य आहे.”
 
 

“स्मिता भागवत यांनी, क्रांती चिरायू होवो, हे पुस्तक अतिशय ओघवत्या शैलीत लिहिले आहे, असे सांगितले. चंद्रशेखर आझाद, दुर्गा देवी होरा, भगवती होरा यांचे क्रांती लढ्यातील कार्य संक्षिप्त रूपात परंतु वेध घेणारे आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक क्रांतिकारकाचा उल्लेखही या पुस्तकात वाचायला मिळतो आणि त्यांच्या कार्याची तीव्रता आपल्या मनाला भेदून जाते. संत चैतन्याचा मेळा आणि क्रांती चिरायू होवो हे दोन्ही पुस्तकं संग्रही ठेवण्यायोग्य व उद्याच्या पिढीसाठी फार महत्त्वाची आहेत.”
 
 

“श्रावणसंध्या काव्यसंमेलनातील निमंत्रित कवी/कवयित्री यांनी सादर केलेल्या निसर्ग कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. गौरी कुलकर्णी, अनुराधा नेरूरकर, कविता राजपूत, शांताराम लोखंडे, प्रशांत राऊत, सूर्यकांत मालुसरे, रेणुका पाटील व इतर कवींनी कविता सादर केल्या. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये गुरूनाथ तेंडुलकर, भूपेश मिस्त्री, संजय भिडे, शिवाजी गावडे, अशोक शिंदे, मंदाकिनी भट, शैलेश शेट्ये व इतर मान्यवर उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा नाईक व लता गुठे यांनी केले.”
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

खर्नीचा राजा रवाना..
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/News-On-Ganpati-Photos.html
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

खर्नीचा राजा रवाना..
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/News-On-Ganpati-Photos.html

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content