Details
अबकी बार मोदी सरकार?
01-Jul-2019
”
संदीप अंभोरे, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
रामराम हो सरपंच सायेब, लोकं राजा हिवाच्यानं घराच्या भाहिर निग्याले मांगपुळे करतात अन तुमी खुशिनाम वट्यावर बसून पेपर वाचून रायले. काल गेल्ते ना काटनमार्केटात, काय मन्ते हाल हवाल! कापसाचा भाव वाढनार हाय की नायी सायाचा?
गेल्तो गळ्या रामदास पन कापसाचं कायी सांगता येत नायी सध्यास. आता सोयाबीनचे भाव वाढेल हायेत. अशीन सोयाबीन तं इकून टाक फटकन!
काय राजा तुमीबी मजाका करता मानसाच्या. कापूस हाय आता घरात मनूनशानी इचालं तुमाले. सोयाबीन रायते काय इतल्या दिवस. ते तं पोत्यात पळत नायी तं त्याच्यामांगं चेळे लागेल असतात. पोत्यात पळ्याचीच देरी असते. काऊन की, त्याच्यावरच सरा यव्हार असते. मंग कसं राईन इतल्या दिवस सोयाबीन घरात. पन सरकारचं काम बी लय बेकार असते हो राजा, जवा शेतकर्याचा माल घरी येते तवा बराबर भाव उतरवते. अन आपून इकटीक केला माल. बेपार्यायजोळ गेला की, मंग बराबर भाव वाढोते सरकार!
त्वालंबी बराबर हाय मना, पन जे बजारातली हवा हाय ते सांगतलं बॉ तुले. गुना मंगापासून काय करून रायला हो अठी? तुवं काय काम व्हतं रे गुना, मंगापासून बशेल हायेस लेका ठोम्यासारका. मन्लं गळ्या हा आता बोलीन मंग बोलीन!
तुमच्या दोघायचं चालू व्हतं बोलनं मनून बॉ आपून कहाले मंधात बोलाव, असं वाटलं मले!
झालं आता आमचं सांग काय म्हनतं?
दाखला पायजे व्हता राजा.
कहाचा दाखला पायजे बे तुले. घरपट्टी भरेल हाय काय ते सांग पयले तुनं? त्याच्याशिवाई कोनालेच दाखला देत नायी!
नायी राजा, तीन वर्सापासून रायेल हाय भर्याची.
मंग कसा भेटीन तुले दाखला. तसा नेमच काळेल हाय आपल्या ग्रामपंचायतनं. माईत नायी का तुले? पानी पट्टी, घरपट्टी भरतच नायीत लोकं. मंग ते लईनवाले प्याच्या पान्याच्या मोटरीचं मीटर काळून नेतात. दोन दिवस पानी नायी आलं की मंग बोंबलता लेकहो, सरपंचाच्या नावानं! आमी का आमच्या खिशातून भराव का आता सर्व्यायच्या घरपट्ट्या! सरपंच झालं मन्जे आता हे कामंबी करा लागतीन वाटते कायी दिसानं!
तसं नायी राजाभाऊ, रायली लेकाची भर्याची. ढोरं इक्याले नेऊन रायल्तो. पोलीस पाटील कायी घरी नायीत. त्यायच्या घरी गेल्तो दाखल्यासाटी. ते जायेल हायेत सासरवाळीले. पाहा बॉ देसान तं बरं व्हईन!
ते तुया पुळचं लेटर दे इकळे, त्यात सर्वे दाखले हायेत, आन दे बरं. ढोरं इक्याले चालोले, त्याचा पायजे ना तुले दाखला! हऽऽ हाऽऽ पाय सापळला. आपून सर्वे दाखले छापूनच आनेल हायेत सायाचे. झंझटमारीच नायी ठेवली कोनती. नाव टाकलं, सई केली की, झालं काम. कोन ठेवीन हो ते भनभन राजा लिव्याची! इतला टाईम कोनाजोळ हाय लिवत बशाले. त्वाले एकल्याचेच हायेत ना बे जनवारं? तुवंच नाव लिवतो मंग! गुणवंत रावसाहेब पंचभाई, किती हायेत रे ढोरं?
चार गायी हायेत, दोन वासर्या अन एक गोरा हाय!
सात जनवारं हायेत नायी का? बरं, हा घे दाखला. जाय झालं त्वालं काम. पन पयशे आले की ते घरपट्टी भरुन टाकजो, नाईतं पुळच्या टायमाले दाखला देनार नाई बरं, सांगून ठेऊन रायलो! तुमाले बरं गमते गळ्या डोक्शावर बोजा असला की! .. सरपंचाचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करून गुणवंत निघून गेला.
काय मन्ते हो पेपर सरपंच. रामदासभाऊ तं लयेच पेपरात घुसुन वाचून रायले लगे. पेपर फाडून अंदर जाता की का हो बावा! डोये कामातून गेले वाटते तुमचे आता. इतल्या वाकोल्या दाखोवून रायले पेपराले तं!
तसं नायी रे गळ्या परलाद. आता नजर लय कमी झाली. अपरेशन सांगेल हाय मले, मोतीबिंदू का काय असते त्याचं! पन आता कसं तरी धकोनं चालू हाये, एक-एक दिवस पुळे! मन्लं पयशे आले की, करुन टाकू!
डोयाच्या अपरेशनले पयशे कहाले लागतात हो राजा, सरकारी दवाखान्यात गेलं की, फुकट करुन देतात ते, तुमी शिनियर शिटीजनमधी येता ना, तुमाले तं एक नया पयसा नाई लागत बावा! व्हसान ना फुटके, करुन घ्या फटकन!
मले तं मायीतच नोतं गळ्या असं असते मनूनशानी! म्यानलं भक्कम पयशे लागत असतीन! मी काय दवाखान्यात गेल्तो का डोये तपाशाले, चष्म्याच्या दुकानात गेल्तो, तं त्यानच सांगतलं अपरेशनच!
हव का, चाला मंग सकायच माया सोबत, देतो तुमचं काम करुन. आपल्या वयखिचेच हायेत सरकारी दवाखान्यातले डाक्टर! लगे एकाचदिशी भरती कर्याले लावतो. अन दूसर्या दिवशी अपरेशनच!
तू गंज करशीन रे बावा, आंधी घरचं नायी पावा लागनार. घरची शेटींग लावतो आंधी ढोरा-वासरायची मंग जाऊ! हा हप्ता जाऊ दे गळ्या परलाद, पुळच्या हप्ती पाऊ!
सांगा ना हो कधीबी. मी कुठी चाललो पऊन. बरं ते जाऊ द्या कापूस हाय का तुमचा?
काऊन काय झालं? आता मी तेच इच्यार्याले आल्तो सरपंच सायेबाले. मन्लं भाव वाढनार हाय का कापसाचा?
गोटूभाई नायीत का कापसाचे बेपारी? त्यायनं जसं मले सांगून ठेवेल हाय की, बॉ सकाय त्यायचा टरक यीऊन रायला आपल्या गावात. कोनाचा कापूस इक्याचा अशीन तं इचारुन ठेवजो. म्यानलं पायतो बॉ, मनून तुमाले इचारलं. जो भायीर भाव अशीन त्याच भावानं घेनार हाय तो बॉ बी! अन पयशे नगदी! वरुन मापात वांदा नायी. बाकीचे कशे मापात दाबून देतात ना हो! इतलं कहाले, आपलं उरय झुरय हाये की नायी, तठोल्ली गोठ सांगतो मी तुमाले कालची!
तठोल्ल्या एका मानसाचा कापूस घेतला एका बेपार्यानं. त्या मानसाच्या कापसात जोळपास दीडक किंटल कापसाची घट आली. त्या मानसानं अशीन आंधीच कापूस मापेल. मंग कापूस कमी भरला कसा? तोबी दीड दोन किंटल. मंग बेपार्याची अन त्या मानसाची झाली झकमक! मंग बॉ बाकीच्या लोकायनं आवरलं. पन त्यानं हुशारी केली. कापूस टरकात टाकून घेतला व्हता आंधीच. मंग काय इलाज व्हता कोनाजोळ! लय झगळा झाला दोघायचा, पन तो बेपारी कहाचा आयीकते हो. अखरशेवटी नायीच देले त्यानं पयशे, जेवळा भरला तेवळेच देले अन गेला. असं व्हते ना नवाळा बेपारी असला की, हा मानूस तसा नायी. भरोशाचा मानूस हाय! फिरुन आपल्या थळीतला. कायीबी झालं तं आपून त्याच्या घरी जाऊ शकतो, तुमाले तं माईतच अशीन ना त्यायचं घर?
गोटू शेठचा नायी वांदा नायी. आपल्याले सर्वच मायीत हाये त्यायचं. दरसाल आपून त्यायलेच तं देतो कापूस!
मंग काय घायबर्याचं काम हाय, सांगतो मंग त्यायले तुमचं नाव रामदास मानेचा हाय बॉ मनून कापूस!
कायी मना राजा सरपंच, शेतकर्यायच्या मालाले भाव नायी राजा भेटत कयीच. दरसालची बोंब हाय. काटनमार्केटात गेलं की, अडते त्यायचं सरकं करून घेतात. हा टॅक्स तो टॅक्स, तोलाई, हमाली अमकं, टमकं. त्यात तोलाईची चिट्टी पायली की परेशान हून जाते शेतकरी, !
..रामदास माने म्हणाला.
अरे बावा रामदास, काल काटनमार्केटात व्हतो दिवसभर, हाल पाववल्या जात नायीत गळ्या शेतकर्यायचे. एका मानसानं तं तुले सांगतो, टरक भरून कांदा आनला अन त्याले भाव भेटला दीड रुपया किलो. वाहतूक खर्च, हमाली अन बाकीचा हिसोब केला तं मन्लं त्याच्या हातात एक नया पयसा उरला नायी. अडत्यानं हिसोब केला तं वरतून त्या शेतकर्याले खिशातले पाच रुपये त्या अडत्याले द्या लागले, सांग मंग, काय कराव त्या शेतकर्यानं!
कायी दिवस थांबा रामदासभाऊ, मोदी सरकार उत्पन्न दुप्पट करनार हाय शेतकर्यायचं. लय भलं व्हनार हाय पुळे पुळे आपलं. थोडा टाईम तं देवाच लागीन ना सरकारले काम कर्याले. आंधीच्या सरकारनं लय घोटाळे करेल हायेत, आंधीचे गड्डेच भुजून रायले आजून नरेंद्र मोदी. तुमी पाहा तं खरी, पुळे पुळे काय व्हते तं! आजलोक तं सर्वे घोटाळेच घोटाळे आयक्याले भेटत बावा. आता कसंयबी काम करनारं सरकार येल हाये. त्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच सुट्टी घेत नायीत मंतात. असं आयीकलं बॉ म्या टीव्हीवर बातम्यायीत सांगत जात मांग तवा! याच्या आंधी असा पंतप्रधान पायला व्हता का कयी, इतलं काम करनारा! ..दीर्घ श्वास सोडत प्रल्हाद बेरके थांबला.
परलाद गळ्या या चार वर्सात तं मले एकबारही चांगला भाव भेटला नायी मालाले! आजलोक निरा बेभाव इकला माल म्या! लय आशेनं मोदीले मत देलं पन आता पसताऊन रायलो. आता तं अब की बार मोदी सरकार असं कोनं आजूबाजूनं म्हनलं तरी भेव लागते लेका! सरपंच हाव मनून दाखोता येत नायी! पन लय मातीत जायेल हाव लेका या चार वर्सात! एक ध्यानात ठेव हे सरकार फक्त जुमले बांधते रे, जुमले बांधते, बाकी कायी नायी करत! काय मनत जात 2022 पर्यंत आमी शेतकर्यायचं उत्पन्न दुप्पट करू! हे करू, ते करू, पन झालं कायीच नायी! तुले वाचता येते ना, हे घे आजचा पेपर वाचून दाखो अठी बशेल हायेत त्या सर्व्यायल! मोठ्यानं वाच सव्यायले आयकू दे!
शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही!
लोकसभेत केंद्र सरकारचे धक्कादायक स्पष्टीकरण
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील शेतकर्यांचे उत्पन्न 2022 पयर्ंत दुप्पट करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते वारंवार देत असले तरी अशी कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी दिली.
अण्णा द्रमुकचे सदस्य आर. पार्थिपन यांच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना नसल्याचे लेखी उत्तर अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी दिले. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकार योजना तयार करीत आहे का आणि असल्यास त्याचे स्वरूप काय आहे, असा पार्थिपन यांचा प्रश्न होता. त्यांच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात साध्वी निरंजन यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.
बातमी वाचताना प्रल्हाद बेरके थांबला. मान वर करून सर्वांकडे बघायला लागला.
सरपंच त्याच्याकडे बघून हसायला लागले. रामदास मानेच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
अबकी बार मोदी सरकार काय? येऊ देनं मले मत मांग्याले, मंग सांगतो एका एकाले, अबकी बार, मोदी सरकारले खड्ड्यात घाल!”
“संदीप अंभोरे, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
रामराम हो सरपंच सायेब, लोकं राजा हिवाच्यानं घराच्या भाहिर निग्याले मांगपुळे करतात अन तुमी खुशिनाम वट्यावर बसून पेपर वाचून रायले. काल गेल्ते ना काटनमार्केटात, काय मन्ते हाल हवाल! कापसाचा भाव वाढनार हाय की नायी सायाचा?
गेल्तो गळ्या रामदास पन कापसाचं कायी सांगता येत नायी सध्यास. आता सोयाबीनचे भाव वाढेल हायेत. अशीन सोयाबीन तं इकून टाक फटकन!
काय राजा तुमीबी मजाका करता मानसाच्या. कापूस हाय आता घरात मनूनशानी इचालं तुमाले. सोयाबीन रायते काय इतल्या दिवस. ते तं पोत्यात पळत नायी तं त्याच्यामांगं चेळे लागेल असतात. पोत्यात पळ्याचीच देरी असते. काऊन की, त्याच्यावरच सरा यव्हार असते. मंग कसं राईन इतल्या दिवस सोयाबीन घरात. पन सरकारचं काम बी लय बेकार असते हो राजा, जवा शेतकर्याचा माल घरी येते तवा बराबर भाव उतरवते. अन आपून इकटीक केला माल. बेपार्यायजोळ गेला की, मंग बराबर भाव वाढोते सरकार!
त्वालंबी बराबर हाय मना, पन जे बजारातली हवा हाय ते सांगतलं बॉ तुले. गुना मंगापासून काय करून रायला हो अठी? तुवं काय काम व्हतं रे गुना, मंगापासून बशेल हायेस लेका ठोम्यासारका. मन्लं गळ्या हा आता बोलीन मंग बोलीन!
तुमच्या दोघायचं चालू व्हतं बोलनं मनून बॉ आपून कहाले मंधात बोलाव, असं वाटलं मले!
झालं आता आमचं सांग काय म्हनतं?
दाखला पायजे व्हता राजा.
कहाचा दाखला पायजे बे तुले. घरपट्टी भरेल हाय काय ते सांग पयले तुनं? त्याच्याशिवाई कोनालेच दाखला देत नायी!
नायी राजा, तीन वर्सापासून रायेल हाय भर्याची.
मंग कसा भेटीन तुले दाखला. तसा नेमच काळेल हाय आपल्या ग्रामपंचायतनं. माईत नायी का तुले? पानी पट्टी, घरपट्टी भरतच नायीत लोकं. मंग ते लईनवाले प्याच्या पान्याच्या मोटरीचं मीटर काळून नेतात. दोन दिवस पानी नायी आलं की मंग बोंबलता लेकहो, सरपंचाच्या नावानं! आमी का आमच्या खिशातून भराव का आता सर्व्यायच्या घरपट्ट्या! सरपंच झालं मन्जे आता हे कामंबी करा लागतीन वाटते कायी दिसानं!
तसं नायी राजाभाऊ, रायली लेकाची भर्याची. ढोरं इक्याले नेऊन रायल्तो. पोलीस पाटील कायी घरी नायीत. त्यायच्या घरी गेल्तो दाखल्यासाटी. ते जायेल हायेत सासरवाळीले. पाहा बॉ देसान तं बरं व्हईन!
ते तुया पुळचं लेटर दे इकळे, त्यात सर्वे दाखले हायेत, आन दे बरं. ढोरं इक्याले चालोले, त्याचा पायजे ना तुले दाखला! हऽऽ हाऽऽ पाय सापळला. आपून सर्वे दाखले छापूनच आनेल हायेत सायाचे. झंझटमारीच नायी ठेवली कोनती. नाव टाकलं, सई केली की, झालं काम. कोन ठेवीन हो ते भनभन राजा लिव्याची! इतला टाईम कोनाजोळ हाय लिवत बशाले. त्वाले एकल्याचेच हायेत ना बे जनवारं? तुवंच नाव लिवतो मंग! गुणवंत रावसाहेब पंचभाई, किती हायेत रे ढोरं?
चार गायी हायेत, दोन वासर्या अन एक गोरा हाय!
सात जनवारं हायेत नायी का? बरं, हा घे दाखला. जाय झालं त्वालं काम. पन पयशे आले की ते घरपट्टी भरुन टाकजो, नाईतं पुळच्या टायमाले दाखला देनार नाई बरं, सांगून ठेऊन रायलो! तुमाले बरं गमते गळ्या डोक्शावर बोजा असला की! .. सरपंचाचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करून गुणवंत निघून गेला.
काय मन्ते हो पेपर सरपंच. रामदासभाऊ तं लयेच पेपरात घुसुन वाचून रायले लगे. पेपर फाडून अंदर जाता की का हो बावा! डोये कामातून गेले वाटते तुमचे आता. इतल्या वाकोल्या दाखोवून रायले पेपराले तं!
तसं नायी रे गळ्या परलाद. आता नजर लय कमी झाली. अपरेशन सांगेल हाय मले, मोतीबिंदू का काय असते त्याचं! पन आता कसं तरी धकोनं चालू हाये, एक-एक दिवस पुळे! मन्लं पयशे आले की, करुन टाकू!
डोयाच्या अपरेशनले पयशे कहाले लागतात हो राजा, सरकारी दवाखान्यात गेलं की, फुकट करुन देतात ते, तुमी शिनियर शिटीजनमधी येता ना, तुमाले तं एक नया पयसा नाई लागत बावा! व्हसान ना फुटके, करुन घ्या फटकन!
मले तं मायीतच नोतं गळ्या असं असते मनूनशानी! म्यानलं भक्कम पयशे लागत असतीन! मी काय दवाखान्यात गेल्तो का डोये तपाशाले, चष्म्याच्या दुकानात गेल्तो, तं त्यानच सांगतलं अपरेशनच!
हव का, चाला मंग सकायच माया सोबत, देतो तुमचं काम करुन. आपल्या वयखिचेच हायेत सरकारी दवाखान्यातले डाक्टर! लगे एकाचदिशी भरती कर्याले लावतो. अन दूसर्या दिवशी अपरेशनच!
तू गंज करशीन रे बावा, आंधी घरचं नायी पावा लागनार. घरची शेटींग लावतो आंधी ढोरा-वासरायची मंग जाऊ! हा हप्ता जाऊ दे गळ्या परलाद, पुळच्या हप्ती पाऊ!
सांगा ना हो कधीबी. मी कुठी चाललो पऊन. बरं ते जाऊ द्या कापूस हाय का तुमचा?
काऊन काय झालं? आता मी तेच इच्यार्याले आल्तो सरपंच सायेबाले. मन्लं भाव वाढनार हाय का कापसाचा?
गोटूभाई नायीत का कापसाचे बेपारी? त्यायनं जसं मले सांगून ठेवेल हाय की, बॉ सकाय त्यायचा टरक यीऊन रायला आपल्या गावात. कोनाचा कापूस इक्याचा अशीन तं इचारुन ठेवजो. म्यानलं पायतो बॉ, मनून तुमाले इचारलं. जो भायीर भाव अशीन त्याच भावानं घेनार हाय तो बॉ बी! अन पयशे नगदी! वरुन मापात वांदा नायी. बाकीचे कशे मापात दाबून देतात ना हो! इतलं कहाले, आपलं उरय झुरय हाये की नायी, तठोल्ली गोठ सांगतो मी तुमाले कालची!
तठोल्ल्या एका मानसाचा कापूस घेतला एका बेपार्यानं. त्या मानसाच्या कापसात जोळपास दीडक किंटल कापसाची घट आली. त्या मानसानं अशीन आंधीच कापूस मापेल. मंग कापूस कमी भरला कसा? तोबी दीड दोन किंटल. मंग बेपार्याची अन त्या मानसाची झाली झकमक! मंग बॉ बाकीच्या लोकायनं आवरलं. पन त्यानं हुशारी केली. कापूस टरकात टाकून घेतला व्हता आंधीच. मंग काय इलाज व्हता कोनाजोळ! लय झगळा झाला दोघायचा, पन तो बेपारी कहाचा आयीकते हो. अखरशेवटी नायीच देले त्यानं पयशे, जेवळा भरला तेवळेच देले अन गेला. असं व्हते ना नवाळा बेपारी असला की, हा मानूस तसा नायी. भरोशाचा मानूस हाय! फिरुन आपल्या थळीतला. कायीबी झालं तं आपून त्याच्या घरी जाऊ शकतो, तुमाले तं माईतच अशीन ना त्यायचं घर?
गोटू शेठचा नायी वांदा नायी. आपल्याले सर्वच मायीत हाये त्यायचं. दरसाल आपून त्यायलेच तं देतो कापूस!
मंग काय घायबर्याचं काम हाय, सांगतो मंग त्यायले तुमचं नाव रामदास मानेचा हाय बॉ मनून कापूस!
कायी मना राजा सरपंच, शेतकर्यायच्या मालाले भाव नायी राजा भेटत कयीच. दरसालची बोंब हाय. काटनमार्केटात गेलं की, अडते त्यायचं सरकं करून घेतात. हा टॅक्स तो टॅक्स, तोलाई, हमाली अमकं, टमकं. त्यात तोलाईची चिट्टी पायली की परेशान हून जाते शेतकरी, !
..रामदास माने म्हणाला.
अरे बावा रामदास, काल काटनमार्केटात व्हतो दिवसभर, हाल पाववल्या जात नायीत गळ्या शेतकर्यायचे. एका मानसानं तं तुले सांगतो, टरक भरून कांदा आनला अन त्याले भाव भेटला दीड रुपया किलो. वाहतूक खर्च, हमाली अन बाकीचा हिसोब केला तं मन्लं त्याच्या हातात एक नया पयसा उरला नायी. अडत्यानं हिसोब केला तं वरतून त्या शेतकर्याले खिशातले पाच रुपये त्या अडत्याले द्या लागले, सांग मंग, काय कराव त्या शेतकर्यानं!
कायी दिवस थांबा रामदासभाऊ, मोदी सरकार उत्पन्न दुप्पट करनार हाय शेतकर्यायचं. लय भलं व्हनार हाय पुळे पुळे आपलं. थोडा टाईम तं देवाच लागीन ना सरकारले काम कर्याले. आंधीच्या सरकारनं लय घोटाळे करेल हायेत, आंधीचे गड्डेच भुजून रायले आजून नरेंद्र मोदी. तुमी पाहा तं खरी, पुळे पुळे काय व्हते तं! आजलोक तं सर्वे घोटाळेच घोटाळे आयक्याले भेटत बावा. आता कसंयबी काम करनारं सरकार येल हाये. त्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच सुट्टी घेत नायीत मंतात. असं आयीकलं बॉ म्या टीव्हीवर बातम्यायीत सांगत जात मांग तवा! याच्या आंधी असा पंतप्रधान पायला व्हता का कयी, इतलं काम करनारा! ..दीर्घ श्वास सोडत प्रल्हाद बेरके थांबला.
परलाद गळ्या या चार वर्सात तं मले एकबारही चांगला भाव भेटला नायी मालाले! आजलोक निरा बेभाव इकला माल म्या! लय आशेनं मोदीले मत देलं पन आता पसताऊन रायलो. आता तं अब की बार मोदी सरकार असं कोनं आजूबाजूनं म्हनलं तरी भेव लागते लेका! सरपंच हाव मनून दाखोता येत नायी! पन लय मातीत जायेल हाव लेका या चार वर्सात! एक ध्यानात ठेव हे सरकार फक्त जुमले बांधते रे, जुमले बांधते, बाकी कायी नायी करत! काय मनत जात 2022 पर्यंत आमी शेतकर्यायचं उत्पन्न दुप्पट करू! हे करू, ते करू, पन झालं कायीच नायी! तुले वाचता येते ना, हे घे आजचा पेपर वाचून दाखो अठी बशेल हायेत त्या सर्व्यायल! मोठ्यानं वाच सव्यायले आयकू दे!
शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही!
लोकसभेत केंद्र सरकारचे धक्कादायक स्पष्टीकरण
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील शेतकर्यांचे उत्पन्न 2022 पयर्ंत दुप्पट करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते वारंवार देत असले तरी अशी कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी दिली.
अण्णा द्रमुकचे सदस्य आर. पार्थिपन यांच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना नसल्याचे लेखी उत्तर अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी दिले. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकार योजना तयार करीत आहे का आणि असल्यास त्याचे स्वरूप काय आहे, असा पार्थिपन यांचा प्रश्न होता. त्यांच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात साध्वी निरंजन यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.
बातमी वाचताना प्रल्हाद बेरके थांबला. मान वर करून सर्वांकडे बघायला लागला.
सरपंच त्याच्याकडे बघून हसायला लागले. रामदास मानेच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
अबकी बार मोदी सरकार काय? येऊ देनं मले मत मांग्याले, मंग सांगतो एका एकाले, अबकी बार, मोदी सरकारले खड्ड्यात घाल!”

