HomeArchiveअंधेरीच्या गोखले पुलाचे...

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण!

Details
अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत 1960च्या सुमारास बांधलेला आणि रेल्वे ट्रॅकवरून जाणारा अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा व थेट पश्चिम द्रूतगती महामार्गापर्यंत जाणारा दुवा म्हणजे अंधेरीचा गोखले पूल. रोज या पुलावरून सुमारे 2.50 ते 3 लाख वाहने ये-जा करतात. गेल्या वर्षी 2 जुलैला सकाळी 8च्या सुमारास पावसात या पुलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरच कोसळल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत बंदच होती. तसेच गोखले पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आणि पुलाचा काही भाग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. परिणामी हा पूल अरूंद झाल्याने गेले वर्षभर अंधेरीकरांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हा पूल कोसळल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेची का रेल्वेची यावरून या दोघांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता.

 

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने गेल्या रविवार दि. 16च्या सकाळपासून हा पूल अखेरीस वाहतूकीस खुला करण्यात आला. या पुलाच्या कामास सुमारे 3.34 कोटी रूपये खर्च आला आहे. आयआयटी पवईने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून या पुलाचा दक्षिणेकडच्या पदपथाचा काही भाग कोसळल्याने येथील पुलाच्या दुरूस्तीचे काम गेल्या जुलैपासून सुरू करण्यात आले होते. पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून या पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. अखेर हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा विश्वास पालिकेच्या के पश्चिम विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.

याप्रकरणी अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले की, सदर घटना घडल्यापासून ते या पुलाची यशस्वी व मजबूत दुरूस्ती होण्यासाठी पालिका, रेल्वे यांच्याशी पाठपुरावा करत होते. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. पावसाळा तोंडावर आला असताना अखेरीस हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत 1960च्या सुमारास बांधलेला आणि रेल्वे ट्रॅकवरून जाणारा अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा व थेट पश्चिम द्रूतगती महामार्गापर्यंत जाणारा दुवा म्हणजे अंधेरीचा गोखले पूल. रोज या पुलावरून सुमारे 2.50 ते 3 लाख वाहने ये-जा करतात. गेल्या वर्षी 2 जुलैला सकाळी 8च्या सुमारास पावसात या पुलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरच कोसळल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत बंदच होती. तसेच गोखले पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आणि पुलाचा काही भाग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. परिणामी हा पूल अरूंद झाल्याने गेले वर्षभर अंधेरीकरांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हा पूल कोसळल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेची का रेल्वेची यावरून या दोघांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता.

 

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने गेल्या रविवार दि. 16च्या सकाळपासून हा पूल अखेरीस वाहतूकीस खुला करण्यात आला. या पुलाच्या कामास सुमारे 3.34 कोटी रूपये खर्च आला आहे. आयआयटी पवईने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून या पुलाचा दक्षिणेकडच्या पदपथाचा काही भाग कोसळल्याने येथील पुलाच्या दुरूस्तीचे काम गेल्या जुलैपासून सुरू करण्यात आले होते. पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून या पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. अखेर हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा विश्वास पालिकेच्या के पश्चिम विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.

याप्रकरणी अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले की, सदर घटना घडल्यापासून ते या पुलाची यशस्वी व मजबूत दुरूस्ती होण्यासाठी पालिका, रेल्वे यांच्याशी पाठपुरावा करत होते. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. पावसाळा तोंडावर आला असताना अखेरीस हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.”
 

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content